शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

महाआघाडीत काँग्रेसला नको मनसेची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 09:02 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधातील महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समावेशावरून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणातणी सुरू झाली आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधातील महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समावेशावरून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणातणी सुरू झाली आहे. महाआघाडीत मनसेला सामील करून घेण्याची भूमिका राष्ट्रवादीने मांडली आहे, तर उत्तर भारतीयांची मते गमाविण्याच्या भीतीपोटी काँग्रेसने मनसेला विरोध केला आहे.मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यातील विविध भागांत विशेषत: शहरी पट्ट्यात राज ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे. या मतदाराला आपल्याकडे वळविण्यासाठी मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसला दिला होता. काँग्रेसने मात्र या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. मनसेला सोबत घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव आला आहे. मात्र, मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसचा केंद्र आणि राज्यस्तरावर विरोध असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केले आहे. मनसे महाआघाडीचा भाग नसेल. मनसे आणि आमची विचारधारा जुळत नाही. मनसे कायद्याचे पालन करत नाही, हिंसेचे राजकारण करतात. २०१४ मध्ये राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता, आताही त्यांनी मोदींनाच पाठिंबा द्यावा.भाजपाचे आणि मनसेचे जवळचे संबंध असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला. उत्तर भारतीय मतदारांमध्ये राज ठाकरे यांची प्रतिमा खलनायकापेक्षा कमी नाही. उत्तर भारतीय हे काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत हे मतदार भाजपासोबत गेले होते. या वेळी ते पुन्हा काँग्रेससोबत येण्याची शक्यता आहे. अशा वेळी राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास उत्तर भारतीय मतदार पुन्हा नाराज होतील आणि याचा फायदा भाजपालाच होईल, असेही संजय निरुपम म्हणाले.मुंबईत काही दिवसांपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीची आगामी निवडणुकीसंदर्भात बैठक पार पाडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी समर्थन दिले होते. शिवडी, दादरसारख्या राज्यातील किमान २५ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अस्तित्व नाही, अशा जागा मनसेला सोडून शहरी भागातील राज ठाकरेंची मते आघाडीकडे वळविता येऊ शकतात. यात आघाडीचाच फायदा होईल, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली. काँग्रेसने उत्तर भारतीय मतांचा मुद्दा पुढे केला असला, तरी त्यात काही दम नाही. उत्तर भारतीय मते काँग्रेसकडे वळतील, अशी चिन्हे सध्या दिसत नसल्याची भूमिकाही राष्ट्रवादीने मांडली होती. काँग्रेसने मात्र मनसेच्या समावेशाला तीव्र विरोध दर्शविला आहे.>निर्णय राज ठाकरे हेच घेतील - मनसेनिवडणुकीसाठी आघाडी करायची का, करायची असेल तर कोणासोबत करायची, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच निर्णय घेतील, अशी सावध प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महाआघाडीबाबत बोलताना दिली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस