शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

महाआघाडीत काँग्रेसला नको मनसेची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 09:02 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधातील महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समावेशावरून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणातणी सुरू झाली आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधातील महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समावेशावरून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणातणी सुरू झाली आहे. महाआघाडीत मनसेला सामील करून घेण्याची भूमिका राष्ट्रवादीने मांडली आहे, तर उत्तर भारतीयांची मते गमाविण्याच्या भीतीपोटी काँग्रेसने मनसेला विरोध केला आहे.मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यातील विविध भागांत विशेषत: शहरी पट्ट्यात राज ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे. या मतदाराला आपल्याकडे वळविण्यासाठी मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसला दिला होता. काँग्रेसने मात्र या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. मनसेला सोबत घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव आला आहे. मात्र, मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसचा केंद्र आणि राज्यस्तरावर विरोध असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केले आहे. मनसे महाआघाडीचा भाग नसेल. मनसे आणि आमची विचारधारा जुळत नाही. मनसे कायद्याचे पालन करत नाही, हिंसेचे राजकारण करतात. २०१४ मध्ये राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता, आताही त्यांनी मोदींनाच पाठिंबा द्यावा.भाजपाचे आणि मनसेचे जवळचे संबंध असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला. उत्तर भारतीय मतदारांमध्ये राज ठाकरे यांची प्रतिमा खलनायकापेक्षा कमी नाही. उत्तर भारतीय हे काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत हे मतदार भाजपासोबत गेले होते. या वेळी ते पुन्हा काँग्रेससोबत येण्याची शक्यता आहे. अशा वेळी राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास उत्तर भारतीय मतदार पुन्हा नाराज होतील आणि याचा फायदा भाजपालाच होईल, असेही संजय निरुपम म्हणाले.मुंबईत काही दिवसांपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीची आगामी निवडणुकीसंदर्भात बैठक पार पाडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी समर्थन दिले होते. शिवडी, दादरसारख्या राज्यातील किमान २५ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अस्तित्व नाही, अशा जागा मनसेला सोडून शहरी भागातील राज ठाकरेंची मते आघाडीकडे वळविता येऊ शकतात. यात आघाडीचाच फायदा होईल, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली. काँग्रेसने उत्तर भारतीय मतांचा मुद्दा पुढे केला असला, तरी त्यात काही दम नाही. उत्तर भारतीय मते काँग्रेसकडे वळतील, अशी चिन्हे सध्या दिसत नसल्याची भूमिकाही राष्ट्रवादीने मांडली होती. काँग्रेसने मात्र मनसेच्या समावेशाला तीव्र विरोध दर्शविला आहे.>निर्णय राज ठाकरे हेच घेतील - मनसेनिवडणुकीसाठी आघाडी करायची का, करायची असेल तर कोणासोबत करायची, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच निर्णय घेतील, अशी सावध प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महाआघाडीबाबत बोलताना दिली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस