शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

काँग्रेसचे दहा आमदार भाजपाच्या संपर्कात; अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 14:50 IST

अब्दुल सत्तार यांनी काल भाजपाचे महत्वाचे नेते गिरीष महाजन यांची भेट घेतली होती.

मुंबई : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. यावेळी त्यांच्यासोबत बंडखोर आमदार अब्दुल सत्तारही होते. सत्तार यांनी काँग्रेसचे 8 ते 10 आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तर विखेपाटलांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. 

राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमुळे आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे नाराज झालेल्या आमदारांवर भाजपात जाण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील नेते पक्षाला संपवत असल्याचा आरोपही त्यांनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता केला. 

अब्दुल सत्तार यांनी काल भाजपाचे महत्वाचे नेते गिरीष महाजन यांची भेट घेतली होती. यानंतर आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी नाराज आमदारांसोबत बैठकही घेतली होती. तसेच विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला तेव्हाही सत्तार सोबत होते. मात्र, विखे पाटलांनी आपल्यासोबत कोणताही आमदार नसल्याचा दावा केला होता. 

माझ्या सोबत कुणीही नाही. ज्यांची नावे घेतली जात आहेत ते केवळ माझे मित्र आहेत. त्यांची उगाच नावे घेणे योग्य नाही. भाजपमध्ये कधी प्रवेश करणार हे लवकरच जाहीर करेन. मात्र, मंत्रिपद देणार की नाही हा निर्णय त्या पक्षाचा असेल, असे राजीनामा दिल्यानंतर विखे पाटलांनी स्पष्ट केले होते. 

 

तसेच विखे पाटलांनीही आपण केंद्रीय नेतृत्वावर नाराज नसल्याचे सांगितले. उलट त्यांनी संधी दिल्यानेच विरोधी पक्षनेता बनता आले. मी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थितीने मला राजीनामा देण्यास भाग पाडल्याचे विखे यांनी यावेळी सांगितले. 

 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस