शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषित केलेले १ कोटी गेले कुठे?; शिवसेनेचा एक पैसाही आला नाही, ट्रस्टचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 17:47 IST

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. या मंदिर निर्माणासाठी कोर्टाच्या आदेशानुसार जो ट्रस्ट स्थापन झाला त्याचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हे आहेत.

ठळक मुद्देसरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होतेराम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केलीशिवसेनेकडून १ रुपयाही अद्याप आला नाही, ट्रस्टचा दावा

अयोध्या – येत्या ५ ऑगस्टला राम मंदिर भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत पार पडणार आहे, या सोहळ्यानिमित्त संपूर्ण अयोध्या नगरीत उत्साह पाहायला मिळत आहे. भूमीपूजनाची जय्यत तयारी राम मंदिर ट्रस्टकडून करण्यात आली आहे. अशातच शिवसेनेने राम मंदिर उभारणीसाठी घोषित १ कोटी रुपयांपैकी १ रुपयाही पोहचला नाही असं राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. या मंदिर निर्माणासाठी कोर्टाच्या आदेशानुसार जो ट्रस्ट स्थापन झाला त्याचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हे आहेत. सध्या राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने महंत गोपाल दास यांच्याशी संवाद साधला त्यात ट्रस्टचे अध्यक्ष गोपाल दास यांनी दावा केला आहे की, शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या देणगीची जी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती, त्यातील एक रुपयाही ट्रस्टला मिळाला नाही.

मात्र महंताच्या या विधानावर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की, २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा दिवशी राम मंदिरासाठी १ कोटी रुपयांची देणगी ट्रस्टकडे जमा करण्यात आलेले आहेत. २८ तारखेला ही रक्कम ट्रस्टकडे जमा झाली असा दावा त्यांनी केला आहे. मात्र महंत यांनी राम मंदिर ट्रस्टला पैसे पोहचले नाहीत असं सांगितल्याने ते १ कोटी रुपये कुठे गेले याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, या सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतले होते, त्यावेळी अयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. मार्चमध्ये उद्धव ठाकरे अयोध्येत गेले होते. तसेच उत्तर प्रदेशातील योगी सरकारने याठिकाणी जागा दिल्यास महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन उभारण्याचा मानस असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले होते.

दरम्यान, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना बोलावलं नसल्याबाबत महंत गोपालदास म्हणाले की, सर्वांना बोलावलं जाईल, अयोध्येत कुणाला आमंत्रणाची गरज पडत नाही, ज्याची भावना आहे ज्याच प्रेम आहे तो आपोआपा येतो, मंदिर निर्माणासाठी पैशांची कमी पडणार नाही असा विश्वासही गोपालदास यांनी व्यक्त केला.  

 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाRam Mandirराम मंदिरAnil Desaiअनिल देसाई