शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हेंची नावं निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 2:11 PM

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक; ११ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हेंची नावं निश्चित करण्यात आली आहेत. लवकरच विधानसभेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदी राहण्यासाठी लवकरात लवकर आमदार म्हणून निवडून येणं गरजेचं आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला पाच तर भाजपला चार जागा मिळणार असल्यानं विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी होणारी निवडणूक बिनविरोधच पार पडेल, अशी चिन्हं आहेत. भाजपने तसे संकेत आधीच दिले आहेत. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या सहा जागा निवडून येतील, असा दावा केला आहे. आमच्याकडे असलेलं संख्याबळ पाहता सहा जागा निवडून शकतात. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येतील, असं थोरात म्हणाले. या संदर्भात लवकरच तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल, असंदेखील त्यांनी सांगितलं.गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीचे पाच, तर भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी किंवा शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ११ तारखेपर्यंत आहे.भाजपमध्ये चार जागांसाठी मोठी स्पर्धा आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नवी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून नावे निश्चित करणार आहेत. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे हे माजी मंत्री भाजपमध्ये इच्छुक आहेत. खडसे यांचं राजकीय पुनर्वसन होते का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. बावनकुळे यांना संधी दिली जाऊ शकते. काँग्रेसमध्ये एका जागेसाठी १०० हून जास्त इच्छुक आहेत. अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी केली जात आहे.काय सांगते आकडेवारी?नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या २९ मतांची आवश्यकता असेल. महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावावर १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते. भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोट्या पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे ११२ मतं आहेत.विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपला चौथी जागा निवडून आणण्याकरिता चार मतं कमी पडत असली तरी गुप्त मतदान असल्यानं ही मतं मिळण्यात काहीच अडचण येणार नाही, असं भाजपचे नेते ठामपणे सांगत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीला सहा उमेदवार निवडून आणण्यासाठी १७४ मते लागतील. विश्वासदर्शक ठरावावर १६९ मतं मिळाली होती. परिणामी महाविकास आघाडीनं जोर लावल्यास सहावी जागा निवडून आणणं शक्य आहे. पण त्यासाठी मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. घरी परतणाऱ्या मजुरांचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणागरीब मजूरांकडून तिकीटाचे पैसे घेऊ नका, मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारला विनंती... तर लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर उतरु, खासदार जलील यांचा इशारा

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकUddhav Thackerayउद्धव ठाकरेNeelam gorheनीलम गो-हेShiv Senaशिवसेना