शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का?; कर्जमाफीवरुन राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 16:57 IST

ठाकरे सरकारचा कर्जमाफीचा निर्णय तकलादू; राजू शेट्टींची टीका

अमरावती : राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने ठाकरे सरकारचा हा निर्णय तकलादू आहे. निव्वळ शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी आणखी कर्जात गुंतत असताना सातबारा कोरा झाला का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.संघटनात्मक बांधणीच्या उद्देशाने विदर्भ दौऱ्यावर असलेल्या शेट्टी यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. दोन्ही कर्जमाफींचा कित्येक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. एक लाखाच्या आत शून्य टक्के व दोन लाखांपर्यंतच्या कर्जावर डॉ. पंजाबराव देशमुख शेतकरी व्याज सवलत योजनेतून तीन टक्के व्याजाची आकारणी होते. यानंतरच्या रकमेवर शेतकऱ्यांना १२ ते १३ टक्के व्याज मोजावे लागते. या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला का?, असा प्रश्न त्यांनी विचारला. आजही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. दररोज १० शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. हे चित्र निराशाजनक असल्याचे शेट्टी म्हणाले.शेतकऱ्यांसाठी सध्या अत्यंत कठीण काळ आहे. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती व ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. रब्बीदेखील माघारला. शेती पिकांच्या नुकसानीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची मागणी राज्यपालांकडे केली होती. मात्र, सत्तेत येताच त्यांना याचा विसर पडला. या सरकारद्वारा घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. तूर, कापूस, सोयाबीन आदी शेतमालाला हमीभाव मिळत नाही. हमीभाव व प्रत्यक्ष विक्री झालेला दर यामधील तफावत शासनाने शेतकऱ्यांना द्यायला हवी, तरच भ्रष्टाचार थांबेल व शासनाची पै न पै मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असेही ते म्हणाले. 

आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी सीएएसध्या देशात वाढती बेरोजगारी, आर्थिक मंदी, घसरला जीडीपी अशा अनेक समस्या आहेत. या समस्यांपासून देशातील नागरिकांचे लक्ष हटवण्यासाठी, जनतेला भावनिक प्रश्नात गुंतविण्यासाठी सीएए, एनआरसीसारखे विषय काढून माणसा-माणसांत भेदभावाचे वातावरण निर्माण केले जात आहे. कोंबड्यांसारखी झुंज लावली जात आहे. या सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. आता देशात याचे विरोधात वातावरण तयार झाले आहे. ज्यांच्याजवळ मालमत्ता, शेती नाही, असे आदिवासी, भूमीहिन कुठून आणणार पुरावे? त्यांच्याकडे पुरावे नाहीत म्हणून त्यांना देशाबाहेर काढणार का, छावणीत ठेणार का, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaju Shettyराजू शेट्टी