शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने अखेर राणेंच्या पुस्तकाचे पवार-गडकरींच्या हस्ते प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 17:26 IST

आपल्या आत्मचरित्रामध्ये राणेंनी शिवसेनेबाबत अनेक गौप्यस्फोट केले असल्याचे बोलले जात आहे. त

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या 'नो होल्ड्स बार्ड' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा मुहूर्त ठरला असून, १६ ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  नारायण राणे यांच्या पुस्तक प्रकाशनाला वेळ देत नसल्याने आता, राणेंच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन खासदार शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

आपल्या आत्मचरित्रामध्ये राणेंनी शिवसेनेबाबत अनेक गौप्यस्फोट केले असल्याचे बोलले जात आहे. तर, राणेंच्या आत्मचरित्रांतील काही पाने माध्यमांच्या हाती लागली होती. त्यात, जर नारायण राणे पक्षात राहिले तर मी आणि रश्मी ठाकरे घर सोडून जाऊ अशी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना धमकी दिल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला होता. त्यामुळे राणे यांचा आत्मचरित्राच्या प्रकाशनाने शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाराजी ओढवून घ्यायची नसल्याने ते प्रकाशनाला वेळ देत नसल्याचे बोलले जात आहे.  

मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने आणि आत्मचरित्र निवडणुकीआधी प्रकाशित करायचे असल्याने राणे यांनी दोन पुस्तकांचे प्रकाशन खासदार शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करणार आहेत. मुबईत शुक्रवारी हे प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. ४ ऑगस्टला हा प्रकाशन सोहळा होणार होता. पण मुख्यमंत्र्यांच्या वेळ उपलब्ध नसल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. राणे यांच्या आत्मचरित्र प्रकाशनानंतर उद्धव ठाकरे यांना हादरे बसणार असल्याचा इशारा याधीच आमदार नितेश राणे यांनी दिला होता. त्यामुळे राणेंच्या आत्मचरित्र प्रकाशनानंतर नेमके काय गौप्यस्फोट होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे.