शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

Maharashtra Political Crisis: “खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन”; शिंदेंचे ठाकरेंना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 09:02 IST

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असतानाच, दुसरीकडे शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. निवडणूक आयोगाने बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत दिली असून, यात कोण बाजी मारणार, याकडे आता नजरा लागल्या आहेत. यातच शिवडी येथील शाखा उद्घाटनावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना थेट इशारा दिला आहे. 

शिंदे गटाने केलेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्ष, संघटना पुन्हा बांधण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरेही सक्रीय झाले असून, निष्ठा यात्रेनंतर राज्यभर शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. तसेच उद्धव ठाकरेही महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असून, त्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. शिवसैनिकांना संबोधित करताना भाजप आणि बंडखोर नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, शिवसेना फोडण्याचा नाही, तर संपविण्याचा हा डाव असल्याचा दावाही त्यांनी केला. तर, आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेदरम्यान पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. 

खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केलेल्या टीकेसंदर्भात एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, खंजीर खुपला, खंजीर खुपसला हे जे काही वारंवार बोलले जात आहे, त्यावर असे बोलू शकतो की, जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये अडकलेत त्यांनी खंजीर खुपसल्याबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. पण खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला हे योग्य वेळ आल्यावर नक्की बोलेन, असा थेट इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. 

दरम्यान, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा कोणी केली, हे सर्वश्रूत आहे. निवडणुकीच्या वेळी एकीकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता तर दुसरीकडे मोदींचा फोटो होता. ज्यांच्याबरोबर आपण निवडून आलो. लोकांनी जे जनमत दिले ते तोडून मोडून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यावर सर्व आमदारांना आक्षेप आहे. म्हणूनच आम्ही ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना