शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

Maharashtra Political Crisis: “खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन”; शिंदेंचे ठाकरेंना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 09:02 IST

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असतानाच, दुसरीकडे शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. निवडणूक आयोगाने बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत दिली असून, यात कोण बाजी मारणार, याकडे आता नजरा लागल्या आहेत. यातच शिवडी येथील शाखा उद्घाटनावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना थेट इशारा दिला आहे. 

शिंदे गटाने केलेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्ष, संघटना पुन्हा बांधण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरेही सक्रीय झाले असून, निष्ठा यात्रेनंतर राज्यभर शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. तसेच उद्धव ठाकरेही महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असून, त्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. शिवसैनिकांना संबोधित करताना भाजप आणि बंडखोर नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, शिवसेना फोडण्याचा नाही, तर संपविण्याचा हा डाव असल्याचा दावाही त्यांनी केला. तर, आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेदरम्यान पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. 

खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केलेल्या टीकेसंदर्भात एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, खंजीर खुपला, खंजीर खुपसला हे जे काही वारंवार बोलले जात आहे, त्यावर असे बोलू शकतो की, जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये अडकलेत त्यांनी खंजीर खुपसल्याबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. पण खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला हे योग्य वेळ आल्यावर नक्की बोलेन, असा थेट इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. 

दरम्यान, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा कोणी केली, हे सर्वश्रूत आहे. निवडणुकीच्या वेळी एकीकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता तर दुसरीकडे मोदींचा फोटो होता. ज्यांच्याबरोबर आपण निवडून आलो. लोकांनी जे जनमत दिले ते तोडून मोडून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यावर सर्व आमदारांना आक्षेप आहे. म्हणूनच आम्ही ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना