शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

Maharashtra Political Crisis: “खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन”; शिंदेंचे ठाकरेंना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 09:02 IST

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असतानाच, दुसरीकडे शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. निवडणूक आयोगाने बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत दिली असून, यात कोण बाजी मारणार, याकडे आता नजरा लागल्या आहेत. यातच शिवडी येथील शाखा उद्घाटनावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना थेट इशारा दिला आहे. 

शिंदे गटाने केलेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्ष, संघटना पुन्हा बांधण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरेही सक्रीय झाले असून, निष्ठा यात्रेनंतर राज्यभर शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. तसेच उद्धव ठाकरेही महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असून, त्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. शिवसैनिकांना संबोधित करताना भाजप आणि बंडखोर नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, शिवसेना फोडण्याचा नाही, तर संपविण्याचा हा डाव असल्याचा दावाही त्यांनी केला. तर, आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेदरम्यान पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. 

खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केलेल्या टीकेसंदर्भात एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, खंजीर खुपला, खंजीर खुपसला हे जे काही वारंवार बोलले जात आहे, त्यावर असे बोलू शकतो की, जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये अडकलेत त्यांनी खंजीर खुपसल्याबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. पण खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला हे योग्य वेळ आल्यावर नक्की बोलेन, असा थेट इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. 

दरम्यान, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा कोणी केली, हे सर्वश्रूत आहे. निवडणुकीच्या वेळी एकीकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता तर दुसरीकडे मोदींचा फोटो होता. ज्यांच्याबरोबर आपण निवडून आलो. लोकांनी जे जनमत दिले ते तोडून मोडून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यावर सर्व आमदारांना आक्षेप आहे. म्हणूनच आम्ही ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना