शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Maharashtra Political Crisis: “खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन”; शिंदेंचे ठाकरेंना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 09:02 IST

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असतानाच, दुसरीकडे शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. निवडणूक आयोगाने बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत दिली असून, यात कोण बाजी मारणार, याकडे आता नजरा लागल्या आहेत. यातच शिवडी येथील शाखा उद्घाटनावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना थेट इशारा दिला आहे. 

शिंदे गटाने केलेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्ष, संघटना पुन्हा बांधण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरेही सक्रीय झाले असून, निष्ठा यात्रेनंतर राज्यभर शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. तसेच उद्धव ठाकरेही महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असून, त्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. शिवसैनिकांना संबोधित करताना भाजप आणि बंडखोर नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, शिवसेना फोडण्याचा नाही, तर संपविण्याचा हा डाव असल्याचा दावाही त्यांनी केला. तर, आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेदरम्यान पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. 

खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केलेल्या टीकेसंदर्भात एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, खंजीर खुपला, खंजीर खुपसला हे जे काही वारंवार बोलले जात आहे, त्यावर असे बोलू शकतो की, जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये अडकलेत त्यांनी खंजीर खुपसल्याबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. पण खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला हे योग्य वेळ आल्यावर नक्की बोलेन, असा थेट इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. 

दरम्यान, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा कोणी केली, हे सर्वश्रूत आहे. निवडणुकीच्या वेळी एकीकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता तर दुसरीकडे मोदींचा फोटो होता. ज्यांच्याबरोबर आपण निवडून आलो. लोकांनी जे जनमत दिले ते तोडून मोडून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यावर सर्व आमदारांना आक्षेप आहे. म्हणूनच आम्ही ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना