शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गणेशोत्सव, दहिहंडी निर्बंधमुक्त; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, सणसमारंभ दणक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 05:27 IST

आता युती सरकार आले आहे. सणवार जल्लोषात साजरे झाले पाहिजेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळात गणेशोत्सव, दहीहंडी  आणि मोहरम तसेच अन्य सणांवर आलेले निर्बंध यंदा हटविण्यात येत असल्याचे तसेच गणेश मूर्तीच्या उंचीवरील बंधने उठविण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. गणरायांचे आगमन आणि विसर्जन मिरवणुका देखील जल्लोषात काढता येतील, असेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे दोन वर्षांनंतर सणसमारंभ, उत्सव आता दणक्यात साजरे होतील. 

गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात तसेच विविध व्यवस्थेबाबतची आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

आता युती सरकार आले आहे. सणवार जल्लोषात साजरे झाले पाहिजेत, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आगमन तसेच विसर्जन मिरवणुकांवर देखील कोणतीही बंधने नसणार आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी एसटीच्या आणखी जादा बसेस सोडण्यात येणार असून दरवर्षीप्रमाणे चाकरमान्यांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे.

शिंदे यांची घोषणा, सणसमारंभ दणक्यात

गणेशोत्सवापुर्वी रस्त्यांवरील सर्व खडडे बुजविण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. गणेशोत्सव मंडळांना नवीन नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा देण्याबरोबरच  नोंदणी शुल्क माफ करण्याचे तसेच गणेशोत्सव काळात पोलीस विभागाकडून घेण्यात येणारे हमी पत्र देखील न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGaneshotsavगणेशोत्सवDahi Handiदहीहंडी