शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:44 IST

Devendra Fadnavis On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी निवडणूक आयोगाबाबत केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

लोकसभा खासदार राहुल गांधींनी राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात दूध का दूध, पाणी का पाणी झालेच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "भारतासारखी  फ्री अँड फेयर निवडणुका कुठेही होत नाही. शरद पवार यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झाल्याचे दिसत आहे", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधींच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यावर फडणवीस म्हणाले की, "राहुल गांधींना भेटल्यानंतर इतक्या दिवसांनी शरद पवारांना निवडणूक प्रक्रियेबाबत शंका का वाटू लागली? राहुल गांधी जसे सलीम- जावेदप्रमाणे रोज नवी स्क्रिप्ट तयार करून काल्पनिक कथा मांडतात, तशीच अवस्था शरद पवारांची तर झाली नाही ना? पण ईव्हीएमवर शंका घेणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. शरद पवार यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, तरी भारतासारखी फ्री अँड फेयर निवडणुका कुठेही होत नाहीत", असे ते म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?शरद पवार म्हणाले की, "राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत आयोगावर आक्षेप घेतले. त्यावर उत्तर देणे ही आयोगाची जबाबदारी आहे. राहुल गांधींनी प्रश्न विचारले आहेत, मग त्यांना उत्तर मिळावे, अशी अपेक्षा आहे. अशावेळी भाजपने टीका का करावी? असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला. शरद पवार पुढे म्हणाले की, एकाच गावात आणि एका घरात एकच व्यक्ती वास्तव्यास असताना तिथे तब्बल ४० लोकांनी मतदान केल्याचे प्रकार समोर आले आहेत. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था असल्याने त्याने या गंभीर आरोपांची गांभीर्याने दखल घ्यावी. या प्रकरणात 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' झाले पाहिजे. राहुल गांधींनी मांडलेली माहिती चुकीची असेल, तर आयोगाने ती स्पष्टपणे फेटाळून लावावी. मात्र, ती माहिती खरी असल्याचे सिद्ध झाले तर, दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी", अशी त्यांनी मागणी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर