शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:44 IST

Devendra Fadnavis On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी निवडणूक आयोगाबाबत केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

लोकसभा खासदार राहुल गांधींनी राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात दूध का दूध, पाणी का पाणी झालेच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "भारतासारखी  फ्री अँड फेयर निवडणुका कुठेही होत नाही. शरद पवार यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झाल्याचे दिसत आहे", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधींच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यावर फडणवीस म्हणाले की, "राहुल गांधींना भेटल्यानंतर इतक्या दिवसांनी शरद पवारांना निवडणूक प्रक्रियेबाबत शंका का वाटू लागली? राहुल गांधी जसे सलीम- जावेदप्रमाणे रोज नवी स्क्रिप्ट तयार करून काल्पनिक कथा मांडतात, तशीच अवस्था शरद पवारांची तर झाली नाही ना? पण ईव्हीएमवर शंका घेणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. शरद पवार यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, तरी भारतासारखी फ्री अँड फेयर निवडणुका कुठेही होत नाहीत", असे ते म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?शरद पवार म्हणाले की, "राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत आयोगावर आक्षेप घेतले. त्यावर उत्तर देणे ही आयोगाची जबाबदारी आहे. राहुल गांधींनी प्रश्न विचारले आहेत, मग त्यांना उत्तर मिळावे, अशी अपेक्षा आहे. अशावेळी भाजपने टीका का करावी? असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला. शरद पवार पुढे म्हणाले की, एकाच गावात आणि एका घरात एकच व्यक्ती वास्तव्यास असताना तिथे तब्बल ४० लोकांनी मतदान केल्याचे प्रकार समोर आले आहेत. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था असल्याने त्याने या गंभीर आरोपांची गांभीर्याने दखल घ्यावी. या प्रकरणात 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' झाले पाहिजे. राहुल गांधींनी मांडलेली माहिती चुकीची असेल, तर आयोगाने ती स्पष्टपणे फेटाळून लावावी. मात्र, ती माहिती खरी असल्याचे सिद्ध झाले तर, दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी", अशी त्यांनी मागणी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर