शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

राज्यात ढगफुटीच्या घटनांमध्ये येत्या काळात आणखी वाढ होणार : हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 18:12 IST

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या १०० वर्षांमध्ये कधी झाला नाही असा ढगफुटीसारखा पाऊस कोल्हापूर भागात झाला आहे

ठळक मुद्देगावपातळीवर पर्जन्यमापक बसविण्याची गरज 

पुणे : यावर्षी राज्यात ढगफुटीच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळते आहे. वातावरणात असलेल्या अस्थिरतेमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास देखील लांबणार आहे. महाराष्ट्रात जागोजागी ढगफुटी म्हणजे ताशी १०० मिलीमीटर दराचा पाऊस दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील होत आहे. मात्र पावसाच्या प्रमाणात व सध्याच्या ढगफुटीच्या घटनांच्या तुलनेत आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ प्रा.किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.

प्रा. किरणकुमार जोहरे हे ढगफुटी तज्ज्ञ म्हणून प्रचलित आहे. तसेच त्यांनी ४ ऑक्टोबर २०१० रोजी पुण्यातील पाषाण येथे ढगफुटी होण्याआधी प्रशासनाला कळवून शेकडो लोकांचे प्राण वाचविले होते. जोहरे यांनी भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्राॅपीकल मेटीओराॅजी (आयआयटीएम) येथे बारा वर्षापेक्षा अधिककाळ शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. 

जोहरे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात गेल्या १०० वर्षांमध्ये कधी झाला नाही असा ढगफुटीसारखा पाऊस कोल्हापूर भागात झाला आहे.तसेच सोलापूर, सांगली, सातारा इथे देखील ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे. तसेच पुणे व अहमदनगर जिल्ह्यात देखील ६ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी रात्री या वेळेत विखुरलेल्या स्वरुपात ढगफुटी सारखा पाऊस झाला. अहमदनगरमध्ये या महिन्याच्या ३ तारखेला सायंकाळी साडे ५ ते साडे ६ या कालावधीत ढगफुटी झाली व मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले व शेकडो वाहने वाहून गेली.  मराठवाड्यातील जालना जिल्हयात सोमवारी ( दि. ७) सायंकाळी ४ ते ५.३० या अवघ्या दीड तासात ५६ मिलीमीटर असा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत ढगफुटीसारखा पाऊस होत आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्य़ातील दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात रविवारी ( दि.६) दुपारी एक ते चार या वेळात विखुरलेल्या स्वरुपात ढगफुटीसारखा पाऊस झाला.

गावपातळीवर पर्जन्यमापक बसविण्याची गरज मान्सूनमध्ये दिवसेंदिवस लक्षणीयरित्या बदल होतो आहे. त्याचाच परिणाम म्हणजे हवामान खात्याने पावसाविषयीचे वर्तवलेले अंदाज देखील बऱ्याचवेळा फोल ठरतात. त्यामुळे होणारे नुकसान टाळणे कठीण जाते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका तसेच गाव पातळीवर पर्जन्यमापक यंत्र बसविल्यामुळे पावसातील बदलांची योग्य नोंद गाव पातळीवर घेतली जाऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. यामुळे गावपातळीवर पर्जन्यमापक बसविण्याची गरज आहे. 

हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्य़ातील गावात पर्जन्यमापक बसविण्यासाठी गावकऱ्यांनीच पुढाकार घ्यावा व आपल्या गावातील पाऊस मोजत त्याच्या नोंदी स्वतः ठेवाव्यात असे आवाहन हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी केले आहे. गावात पर्जन्यमापक कसे बनवायचे हे गावकऱ्यांनीच स्वतः शिकून घ्यावे तसेच शाळाकाॅलेजच्या विद्यार्थ्यांना देेखील ते बनविता येतील इतके सोपे आहे.  

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊसFarmerशेतकरी