शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

लडकोंपे नजर रखनी पडेगी!

By admin | Updated: December 4, 2014 02:49 IST

हमे भी ये जानना होगा की हमारे बच्चे किसके संगत मे है और वो दिन भर क्या कर रहे है... कल्याणच्या सर्वोदय रेसिडेन्सीमधून बाहेर

मुंबई : हमे भी ये जानना होगा की हमारे बच्चे किसके संगत मे है और वो दिन भर क्या कर रहे है... कल्याणच्या सर्वोदय रेसिडेन्सीमधून बाहेर पडणारा मध्यमवयीन रहिवासी सांगत होता. जिहादी विचारांचा पगडा असलेला आरीफ माजीद याच सोसायटीतला. भारतात परतून अरीबला सहा दिवस झाले. त्याचे गायब होणे, इसीससाठी सीरीयात जाणे आणि परतल्यावर एनआयएने अटक करणे यामुळे निर्माण झालेला तणाव या सोसायटीतल्या वातावरणात जाणवत होता. आरीफसह त्या चार तरुणांचे हे कृत्य आम्हाला पटलेले नाही, अशीच प्रतिक्रिया या सोसायटीसह अन्य मोहल्ल्यातूनही व्यक्त होते आहे.आरीफ सहीसलामत भारतात परतल्याने अमन तांडेल, फहाद शेख आणि साहीम तानकी यांच्या कुटुंबियांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. हे तिघे आरीफप्रमाणे सहीसलामत परतावेत यासाठी कुटुंबियांसह परिचयातील सर्वांनी प्रार्थनाही सुरू केल्या आहेत. हे चारही तरुण राहत असलेल्या सोसायट्या, मोहल्ल्यांमध्ये फेरफटका मारला असता तेथे तणावपूर्ण शांतता आढळली. विशेषत: अनोळखी व्यक्तींकडे नजरांमध्ये संशय दिसला. आरीफच्या घराचे दार त्याच्या आईने उघडले. उसने हसू आणून तिने सलामदुवाही स्वीकारला. मात्र आरीफचे नाव ऐकून त्याच्याबाबतचे प्रश्न ऐकून तिच्या चेहऱ्यावर तरळलेली काळजी स्पष्टपणे दिसली. आरीफके अब्बू घर पे नही है. वो एनआयए के दफ्तर गये है. घरपे सब औरते है. बोलने वाला कोई भी नही... काही ऐकण्याच्या आत तिने सांगून टाकले. त्यातही आरीफबाबत जाणून घेण्याची धडपड लोकमत प्रतिनिधीने केली तेव्हा तीने हमे कुछ कहना नही है, असे सांगून तोंडावर दार बंद केले. त्या त्या मोहल्ला, सोसायट्यांच्या आसपास राहणाऱ्यांना या चौघांची कृती चांगलीच ठाऊक आहे. मात्र अनोळखींसमोर कोणीही बोलायला तयार नव्हता. अरे भाय, हम तो यहा नये है, अशी प्रतिक्रिया देऊन चार ते पाच जणांनी परस्पर टाळले. काहींनी तर चक्क यापैकी कोणालाच ओळखत नाही, असे सांगून टाकले. काहींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या चारही तरुणांनी खूप आधीपासून सीरियात जाण्याची तयारी केली होती. त्यांची माथी इथल्या लोकांनी भडकावली. त्यांच्या मनाचा ठाव जिहादी विचार घेत होते. मात्र त्यांच्या पालकांना यातले काहीएक ठाऊक नव्हते. जेव्हा समजले तेव्हा ते हादरलेच असावेत. तो धडा सर्वांनीच घ्यायला हवा. मुले शिक्षणाच्या किंवा अन्य कोणत्याही निमित्ताने घराबाहेर असतात तेव्हा ते कोणाच्या संगतीत असतात, त्यांचा मित्रपरिवार कोण हे जाणून घ्यायला हवे. (प्रतिनिधी)