शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

वसईतील पर्यटन विकासासाठी मुख्यमंत्र्यांना घातले साकडे

By admin | Updated: April 26, 2016 05:32 IST

आमदार निवासाच्या मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कोकणातील आमदार यांच्या उपस्थित पर्यटन वर्धापन दिन साजरा केला.

वसई/पारोळ : कोकणातील पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक व आंबा उत्पादक यांनी आमदार निवासाच्या मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कोकणातील आमदार यांच्या उपस्थित पर्यटन वर्धापन दिन साजरा केला. त्यावेळी वसई परिसरात पर्यटनाचा विकास केल्याबाबत वसईचे महादेव निजाई यांचा सत्कार करण्यात आला.वसई तालुक्यात अर्नाळा, कळंब, नवापूर, गावातील सरकारी जमीनीवरील अतिक्रमणाबाबत निवेदन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना देण्यात आले. त्यामध्ये नवापूर व कळंब या गावातील स्थानिक भूमीपुत्रांनी सरकारी जागेत अतिक्रमण करून १०० ते १५० वर्षापासून जी जमीन आपल्या ताब्यात ठेवली आहे. व त्यावर त्यांनी आता पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांना त्या जमिनीचे हक्क शासनाने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. जर सरकारी जमिनीवरील सन २००० पूर्वीची अतिक्रमणे व बांधकामे कायदेशीर केली जाऊ शकतात तर कळंब, नवापूर, अर्नाळा येथील सरकारी जागेवरील बांधकामे कायदेशीर करण्यात कोणती अडचण आहे, वसईचा पर्यटन विकास साधायचा असेल सरकारने हे पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे निजाई यांनी लोकमतला सांगितले.कोकणाला ७५२ किमीचा समुद्रकिनारा लाभला असला तरी गोवा व केरळच्या मानाने महाराष्ट्राचे पर्यटनक्षेत्रातील उत्पन्न कमी आहे. वसईला लाभलेला समुद्रकिनारा, इतिहासातील स्थळे, सागरी किल्ले, धार्मिक स्थळे यामुळे सरकारने पर्यटन व्यवसायीकांच्या मागण्या मान्य केल्यास वसईत पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस येतील. असा दावा यावेळी करण्यात आला. (वार्ताहर)