प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची यादी प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आली असून, नितेश राणे यांच्या मंत्रालयाच्या अधिन असलेल्या महाराष्ट्र सागरी मंडळाने २०० गुणापैकी १९८.७५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळातील कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
या संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये नितेश राणे म्हणाले की, प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला "१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम" हा डिजिटल परिवर्तनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. याअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था/मंडळे व कंपन्यापैकी महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) या मंडळाने सामान्यीकृत २०० गुणापैकी १९८.७५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
सागरी मंडळ(MMB) या मंडळाने सामान्यीकृत (राज्यातील सर्व प्रवर्गांमध्ये) २०० गुणापैकी १९८.७५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) या मंडळातील आणि बंदरे विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन, अशा शब्दात नितेश राणे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे.
Web Summary : Under Fadnavis' guidance, Maharashtra Maritime Board excelled in e-governance, securing top rank with 198.75/200. Nitesh Rane lauded the team's efforts for transparent and efficient administration.
Web Summary : फडणवीस के मार्गदर्शन में, महाराष्ट्र समुद्री बोर्ड ने ई-गवर्नेंस में उत्कृष्ट प्रदर्शन किया, 198.75/200 के साथ शीर्ष स्थान प्राप्त किया। नितेश राणे ने पारदर्शी प्रशासन के लिए टीम के प्रयासों की सराहना की।