शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 11:56 AM

गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे वरळी विधानसभेमधून निवडणुक लढवतील अशी चर्चा रंगलेली आहे.

नांदेड: गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे वरळी विधानसभेमधून निवडणुक लढवतील अशी चर्चा रंगलेली आहे. दरम्यान, शुक्रवारी शिवसेनेच्या वरळीमधील कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांनी आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतूनच निवडणुक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभेतून जो उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहील तोच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांनी या मेळाव्यात केले होते. त्यामुळे अनिल परबांनी केलेल्या या विधानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता अनिल परब शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आगामी विधानसभेच्या तोंडावर युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन आमने सामने येण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या जनआर्शीवाद यात्रेद्वारे महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यातच अनिल परब यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच आदित्य ठाकरे यांना वरळीतून उमेदवारी देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केल्यास शिवसैनिक या भागात दिवसाची रात्र करून विरोधकांचे डिपॉझिट जप्त करतील,असा शब्दही उद्धव यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा