शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
4
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
5
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
6
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
7
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
8
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
9
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
10
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
11
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
12
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
13
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
14
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
15
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
16
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
18
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
19
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
20
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन युतीने नागरिकांना फसवले- अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 06:40 IST

शिवस्वराज्य यात्रेची किल्ले रायगडावर सांगता

महाड : राज्यात सत्तेत असलेल्या युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन केवळ जनतेला फसविण्याचे काम केले नाही, तर महाराजांचा अपमान करण्याचे पाप देखील केले आहे. राज्यातील मतदार या सरकारला माफ करणार नाही आणि सत्तेवरून खाली खेचून खऱ्या अर्थाने छ. शिवरायांच्या, महात्मा जोतिबा फुलेंच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादी काँँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता आणि आघाडीच्या प्रचार सभेत व्यक्त केला.खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या शिवनेरी ते रायगड या शिवस्वराज्य यात्रेच्या समारोप शनिवारी किल्ले रायगडवर करण्यात आला. त्यानंतर महाड शहरातील शिवाजी चौकात यात्रेची सांगता आणि आघाडीचे उमेदवार माणिक जगताप यांच्या प्रचाराची सभा घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्यातील युती सरकारवर आक्रमक भाषेत टीकास्त्र सोडले. गुजरातमध्ये केवळ पाच वर्षांत चार हजार कोटी रुपये खर्च करून सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहिला.महाराष्ट्रात अरबी समुद्रातील शिवस्मारकाची आणि इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची एक वीट देखील उभी राहिलेली नाही. छत्रपती शिवरायांच्या नावाने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे काम या सरकारने केले आहे. गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तरी मागे घेण्यात आलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या जनादेश यात्रेचा समारोप नाशिक येथे झाला. नाशिकला दक्षिण काशी म्हटले जाते. लोक तेथे पाप धुण्यासाठी येतात. मात्र नाशिक येथील सभेने या सरकारवरचे पाप धुतले जाणार नाही अशी टीकाही त्यांनी केली.किल्ले रायगडावर छ. शिवरायांना अभिवादन केल्यावर ही यात्रा महाडमध्ये आली. चवदार तळ्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या सर्व नेत्यांनी अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, रायगडचे खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, आ. संजय कदम, आ. अनिकेत तटकरे, महाडचे माजी आमदार माणिक जगताप, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप आदी मान्यवरांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी, रायगडच्या भूमीत खंडणी आणि गुंडगिरी करणारा आमदार नको, असे आवाहन मतदारांना केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दांमध्ये टीकास्त्र सोडले. आदित्य ठाकरे महाडमध्ये आले. पण ते रायगडला गेले नाहीत. त्यांनी रायगड चढून दाखवावा असे आव्हानच मिटकरी यांनी त्यांना दिले. महाराष्ट्राचे नेतृत्व हे वाघानेच केले पाहिजे पेंग्विनने नाही असा टोलाही मिटकरी यांनी लगावला.आघाडीचे सरकार येणारमाजी आमदार माणिक जगताप यांनी पाचाड येथे राजमाता जिजाऊंची पुण्यतिथी साजरी करण्याचा कार्यक्रम खा. सुनील तटकरे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि आपण जिल्हा परिषद सदस्य असताना केले, राजांचे नाव घेऊन पोट भरणारी जमात राज्य करत आहे. हे लोक स्वत:ला शिवभक्त समजतात. त्यांनी रायगडसाठी काय केले असा सवाल जगताप यांनी विचारला.राज्यात आघाडीचेच सरकार येणार आणि आमदार म्हणून पुन्हा एकदा या मतदारसंघात विकासाची क्रांती घडवून आणण्यासाठी मी देखील सज्ज असणार असा विश्वास जगताप त्यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटीलयांनी भाजप सरकार हे छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची फारकत घडवून आणणारे, जातीयवादी सरकार असल्याचे टीकास्त्र सोडले. जर या सरकारने काम केले असते तर मते मागण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. मच्छीमार, आंबा बागायतदार, सुपारी उत्पादक सर्वांच्याच तोंडाला पाने पुसली आहेत आणि म्हणूनच त्यांना मतांचा जोगवा मागण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस