शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

महाराष्ट्राच्या भावनेशी खेळ करणाऱ्या CM एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा; संजय राऊत संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 10:38 IST

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई - हे बेईमान, गद्दार सरकार आहे त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला तो कोसळला. चांगल्या मनाने हे बनवलं नाही. राजकीय हेतूने बनवला. छत्रपती शिवाजी महाराजांनाही या लोकांनी सोडलं नाही. पुतळ्याच्या बांधकामातही लाखो-कोट्यवधीचा घोटाळा केला.  महाराष्ट्राच्या भावनेशी खेळ करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला हवा. जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, रवींद्र चव्हाण त्यांना बडतर्फ करायला हवं अशी मागणी करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. 

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम खाते आणि सरकारनं आपापल्या लोकांना टेंडर दिले. शिवाजी महाराजांना तरी सोडा. ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करतात यावर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. महाविकास आघाडी या विषयाचा गांभीर्याने विचार करते. पुढे काय पाऊलं उचलायची आणि महाराष्ट्राच्या जनतेला कसं सामोरे जायचं. महाराष्ट्रात जो भ्रष्टाचार सुरू आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत या सर्व गोष्टी जनतेसमोर आम्ही सांगणार आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे म्हणून ते जमिनीवरून वर उडतायेत. नरेंद्र मोदी राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी घाईघाईने या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. आम्ही केले, आम्ही केले ही श्रेयवादाची लढाई होती. तुम्ही इतकी घाई करू नका असं छत्रपती शिवाजीराजेंचं वंशज कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सांगितले होते तरीही केले. सर्व कंत्राटदार मुख्यमंत्र्यांचे होते. महाराष्ट्रावर हा मोठा आघात आहे. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवरायांचा पुतळा त्यांच्याच किल्ल्यावर पडेल हे दुर्दैवी चित्र महाराष्ट्राने पाहिले. हवा महाराष्ट्रात जोराने वाहते, परंतु अनेक पुतळे किल्ल्यावर, समुद्राकिनारी आहेत. सत्तेची हवा डोक्यात गेली आहे असा घणाघात संजय राऊतांनी केला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेल्या प्रतापगड किल्ल्यावर पंडित नेहरुंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केले. तो आजही मजबुतीने उभा आहे. मात्र ८ महिन्यापूर्वी सिंधुदुर्गात उभारलेला पुतळा ज्याप्रकारे उद्ध्वस्त झाला ती खूप मोठी वेदना आहे. त्या कामातही भ्रष्टाचार केला जातोय जिथं राष्ट्रभक्तीचं नाव घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही भ्रष्टाचार केला. लाडकी बहिण बोलता पण आमच्या लाडक्या राजाला सांभाळू शकला नाही. महाविकास आघाडी हा विषय गंभीरतेने घेणार आहे असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊतShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४