शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; हाती कागद घेऊन खतांच्या किंमतीच वाचल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 13:05 IST

Loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात उद्धव ठाकरेंनी शेतकरी सन्मान निधीवरून भाजपावर टीका केली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई - Chandrakant Patil on Uddhav Thackeray ( Marathi News ) यावेळच्या निवडणुकीत ज्याला जे काही तोंडात येईल ते बोलतोय. आकडे माहिती करून घ्यायची नाही. उद्धव ठाकरेंनी विदर्भातील सभेत हास्यास्पद आरोप पंतप्रधानांवर केला. शेतकरी १ लाखाचं खत घेतात, त्यावर १८ टक्के GST म्हणजे १८ हजार घेतात. त्यातलेच ६ हजार तुम्हाला परत देतात असं विधान केले होते. त्यावर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी कधी शेती केलीय का?, खतांच्या किंमती माहिती आहे का? खतांवर किती जीएसटी लागतो हे माहिती आहे का असा प्रश्न केला. 

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, खतांवर ५ टक्के जीएसटी लागतो आणि तो पुरवठादारापासून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचेपर्यंत इतका कमी होतो, समजा १ लाखाचं खत आहे, त्यावर ५ हजार जीएसटी असते, तेव्हा शेतकऱ्यांपर्यंत येईपर्यंत तो ३००-४०० रुपये होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शेतकरी सन्मान निधीतून ज्या शेतकऱ्यांना ६ हजार मिळतात तो अल्पभूधारक शेतकरी, गरीब, मजूर शेतकऱ्यांना मिळतात. त्याला १ लाखाचे खत घ्यावे लागत नाही. ४५ किलोची एक बॅग शेतकरी घेतो तेव्हा त्याला २६६ रुपये द्यावे लागतात. त्यावर कंपनीला अनुदान म्हणून १५६१ रुपये सरकारला द्यावे लागतात, त्यामुळे १९०० चं पोतं शेतकऱ्यांना २६६ रुपयाला मिळते असं त्यांनी म्हटलं.

तसेच शेतीबद्दल काय माहिती नसताना हे बोलणं, १ लाखाचं खत घेणारा हा किती मोठा शेतकरी आहे त्याला शेतकरी सन्मान निधीतून पैसे मिळत नाहीत. काहीही बोलायचं, शेतकऱ्यांना आणि लोकांना भ्रमित करायचे यातून काहीही साध्य होणार नाही. रासायनिक खतांवर ५ टक्के जीएसटी आहे. प्रत्यक्षात १९०० रुपयांचं पोतं २६६ रुपयाला घ्यावे लागते. त्यामुळे तुमच्यानिमित्ताने शेतकऱ्यांना या गोष्टीची माहिती मिळाली असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

गेल्या १० वर्षात किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालंय? किती शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळालेत? शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची दानत भाजपात नाही. विदर्भ हा विकासात मागे राहिला आहे. १० वर्ष तुम्ही केंद्रात होता, मधलं अडीच वर्ष सोडले तर गेल्या १० वर्षात विदर्भाचा विकास का केला नाही. मी मुख्यमंत्री असताना २ लाखापर्यंत कर्जमुक्त केले होते. समजा शेतकऱ्यांनी वर्षाला १ लाखाचे खत घेतले, त्यावर १८ टक्के जीएसटी, म्हणजे १ लाखावर १८ हजार कुणाच्या खिशातले जातात, त्याच्यातले ६ हजार शेतकऱ्यांना देतात, मग उरलेले १२ हजार कुणाच्या खिशात जातात असं विचारतात, तुमचाच खिसा कापून तुम्हाला भीक देतायेत आणि त्यावर उपकार केल्याचा आव आणतायेत असं विधान उद्धव ठाकरेंनी केले होते.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाFarmerशेतकरीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४