शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

सरकार पाडण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर; शरद पवारांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 06:52 IST

आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या छापेमारीवर जोरदार टीका करून पवार म्हणाले की, ज्या राज्यात भाजप विचारांचे सरकार नाही, तेथील राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे.

पिंपरी (पुणे) : ईडी, सीबीआय, नार्कोटिक, प्राप्तिकर या सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर केंद्र सरकार करीत आहे. कितीही छापे मारा, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार यत्किंचितही हलणार नाही. पाच वर्षे हे सरकार टिकणार आहे. उलट जनतेचा विश्वास जिंकून पुन्हा हेच सरकार येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या छापेमारीवर जोरदार टीका करून पवार म्हणाले की, ज्या राज्यात भाजप विचारांचे सरकार नाही, तेथील राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. भाजपचे एक माजी खासदार, एक माजी मुख्यमंत्री बोलले, की यंत्रणेकडून लगेच कारवाई सुरू होते. यावरून जनतेने काय समजायचे? खासदार भावना गवळी, शिवसेना नेते अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विराेधात सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. ही बाब चुकीची आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पंच म्हणून घेऊन, चांगल्या माणसांच्या विरोधात खोटे पुरावे तयार करून अडकविण्याचे काम सुरू आहे. हे योग्य आहे का? असा सवालही त्यांनी केला.आरोप करणारे पोलीस आयुक्त बेपत्तापवार म्हणाले की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलीस आयुक्त गायब आहेत. देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मात्र, आरोप करणाऱ्या पोलीस आयुक्तांवर गुन्हे दाखल होत आहेत. ते कुठे आहेत कोणालाही माहीत नाही. त्यांना शोधण्यात तपास यंत्रणा पुढाकार घेत नाहीत.सूडबुद्धीने कारवाया‘मी पुन्हा येणारच...’ असे छातीठोकपणे सांगणारे, ते काही आले नाही. म्हणून राजकीय आकसाने, सूडबुद्धीने महाविकास आघाडीच्या मंत्री, नेते यांच्या चौकशी सुरू आहेत. सत्ता नसल्याने त्यांची आणि त्यांच्या पक्षाची अस्वस्थता वाढली आहे. त्यातूनच ते काहीही टिप्पणी करू लागले आहेत. सत्ता नसल्याचे हे दु:ख असल्याचा टोला पवारांनी फडणवीस यांना हाणला.‘पाहुण्यांना’ वरूनच आदेशपवार म्हणाले, ‘अजित पवार यांच्या भगिनींच्या घरी जाऊन प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. हा विषय कोर्टात आहे, पण त्यात काही निष्पन्न होणार नाही, पण पंधरा ते वीस लोक पाच दिवस छापे मारतात. त्यांचे काम संपल्यानंतरही त्यांना थांबविले जाते. चौकशी झाल्यावर पाहुणे परत जाणे आवश्यक होते. पाहुणा जेव्हा जात नाही तेव्हा त्यांची हकालपट्टी करावी लागते. मात्र, पाहुण्याची काही चुकी नव्हती. कारण त्यांना वरून तसे आदेश दिले होते.’उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे, हा माझा आग्रहदोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ता स्थापना करताना महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व कोणी करावे, यासाठी आमच्याकडे दोन-तीन नावे होती. तीन पक्षांच्या आमदारांच्या बैठकीत उध्दव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते. त्यांचा हात मी स्वत: वर केला व हे आपल्या सरकारचे नेतृत्व करतील, असे जाहीर केले. 

सुरुवातीला उध्दव नेतृत्व करण्यास तयार नव्हते; पण... शिवसेनाप्रमुखांच्या चिरंजीवाने मुख्यमंत्री व्हावे, असा माझा आग्रह होता, त्यामुळेच सक्तीने त्यांचा हात वर केला. ही वस्तुस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस यांनी अनाठायी आरोप करणे योग्य वाटत नाही, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार