शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सरकार पाडण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर; शरद पवारांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 06:52 IST

आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या छापेमारीवर जोरदार टीका करून पवार म्हणाले की, ज्या राज्यात भाजप विचारांचे सरकार नाही, तेथील राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे.

पिंपरी (पुणे) : ईडी, सीबीआय, नार्कोटिक, प्राप्तिकर या सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर केंद्र सरकार करीत आहे. कितीही छापे मारा, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार यत्किंचितही हलणार नाही. पाच वर्षे हे सरकार टिकणार आहे. उलट जनतेचा विश्वास जिंकून पुन्हा हेच सरकार येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या छापेमारीवर जोरदार टीका करून पवार म्हणाले की, ज्या राज्यात भाजप विचारांचे सरकार नाही, तेथील राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. भाजपचे एक माजी खासदार, एक माजी मुख्यमंत्री बोलले, की यंत्रणेकडून लगेच कारवाई सुरू होते. यावरून जनतेने काय समजायचे? खासदार भावना गवळी, शिवसेना नेते अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विराेधात सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. ही बाब चुकीची आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पंच म्हणून घेऊन, चांगल्या माणसांच्या विरोधात खोटे पुरावे तयार करून अडकविण्याचे काम सुरू आहे. हे योग्य आहे का? असा सवालही त्यांनी केला.आरोप करणारे पोलीस आयुक्त बेपत्तापवार म्हणाले की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलीस आयुक्त गायब आहेत. देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मात्र, आरोप करणाऱ्या पोलीस आयुक्तांवर गुन्हे दाखल होत आहेत. ते कुठे आहेत कोणालाही माहीत नाही. त्यांना शोधण्यात तपास यंत्रणा पुढाकार घेत नाहीत.सूडबुद्धीने कारवाया‘मी पुन्हा येणारच...’ असे छातीठोकपणे सांगणारे, ते काही आले नाही. म्हणून राजकीय आकसाने, सूडबुद्धीने महाविकास आघाडीच्या मंत्री, नेते यांच्या चौकशी सुरू आहेत. सत्ता नसल्याने त्यांची आणि त्यांच्या पक्षाची अस्वस्थता वाढली आहे. त्यातूनच ते काहीही टिप्पणी करू लागले आहेत. सत्ता नसल्याचे हे दु:ख असल्याचा टोला पवारांनी फडणवीस यांना हाणला.‘पाहुण्यांना’ वरूनच आदेशपवार म्हणाले, ‘अजित पवार यांच्या भगिनींच्या घरी जाऊन प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. हा विषय कोर्टात आहे, पण त्यात काही निष्पन्न होणार नाही, पण पंधरा ते वीस लोक पाच दिवस छापे मारतात. त्यांचे काम संपल्यानंतरही त्यांना थांबविले जाते. चौकशी झाल्यावर पाहुणे परत जाणे आवश्यक होते. पाहुणा जेव्हा जात नाही तेव्हा त्यांची हकालपट्टी करावी लागते. मात्र, पाहुण्याची काही चुकी नव्हती. कारण त्यांना वरून तसे आदेश दिले होते.’उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे, हा माझा आग्रहदोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ता स्थापना करताना महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व कोणी करावे, यासाठी आमच्याकडे दोन-तीन नावे होती. तीन पक्षांच्या आमदारांच्या बैठकीत उध्दव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते. त्यांचा हात मी स्वत: वर केला व हे आपल्या सरकारचे नेतृत्व करतील, असे जाहीर केले. 

सुरुवातीला उध्दव नेतृत्व करण्यास तयार नव्हते; पण... शिवसेनाप्रमुखांच्या चिरंजीवाने मुख्यमंत्री व्हावे, असा माझा आग्रह होता, त्यामुळेच सक्तीने त्यांचा हात वर केला. ही वस्तुस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस यांनी अनाठायी आरोप करणे योग्य वाटत नाही, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार