शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रात मुख्यमंत्र्यांची पत नाही !

By admin | Updated: March 12, 2015 01:55 IST

केंद्रात मुख्यमंत्र्यांची पत नाही त्यामुळेच ६२१३ कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडे मागून एक छदामही महाराष्ट्राला मिळाला नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

मुंबई : केंद्रात मुख्यमंत्र्यांची पत नाही त्यामुळेच ६२१३ कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडे मागून एक छदामही महाराष्ट्राला मिळाला नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. नियम ९७ अन्वये विरोधी पक्षाने तर नियम २६० अन्वये सत्ताधारी पक्षाने अवकाळी पाऊस, गारपीट व शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यावर सभागृहात चर्चा उपस्थित केली होती. मुंडे म्हणाले की, यापूर्वी महाराष्ट्राने केंद्राकडे १०७३ कोटी मागितले तेव्हा केंद्राने ५४४ कोटी दिले होते. त्यानंतर ३२३२ कोटींची मागणी केली तेव्हा ७७८ कोटी दिले होते. यावेळी ६२१३ कोटी रुपयांची मागणी करूनही केंद्राने छदाम दिला नाही. त्यामुळे केंद्रात महाराष्ट्राची की मुख्यमंत्र्यांची पत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.केंद्राप्रमाणे महाराष्ट्रात भाजपाचे सरकार निवडून दिले तर मागील सरकारने मिळवून दिली त्यापेक्षा भरीव मदत देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. प्रत्यक्षात ४५ रुपये गुंठा या दराने मदत देऊ केली आहे, असे नमूद करून मुंडे म्हणाले की, सरकारने देऊ केलेल्या तुटपुंज्या मदतीत आपले १०० रुपये जमा करून शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेले धनादेश परत केले आहेत. असे काही धनादेश मुंडे यांनी सरकारला सुपूर्द केले. केंद्र सरकारच्या निकषांमुळे महाराष्ट्राला भरीव मदत मिळत नसेल तर ते निकष बदलायला लावा अथवा कर्ज काढा परंतु शेतकऱ्यांना भरीव मदत करा, अशी मागणी त्यांनी केली.सभागृहनेते व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांना उद्देशून मुंडे म्हणाले की, तुम्ही बांधावरील शेतकरी असतानाही खरीप हंगामात दुष्काळाची मदत घेतली असेल तर रब्बीच्या काळातील अवकाळी पावसाची नुकसान भरपाई देता येणार नाही, अशी भूमिका कशी घेतली. तुमच्याकडून शेतकऱ्यांची अशी क्रुर चेष्टा अपेक्षित नाही. शिवसेनेच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या तीव्र भावनांशी सहमत व्यक्त करीत गावागावात फिरणे मुश्कील झाल्याचे मुंडे म्हणाले. अगोदर दुष्काळ, नंतर गारपीट आणि आता अवकाळी पाऊस राज्यातील सरकारचा पायगुण चांगला नाही, अशी टिप्पणी मुंडे यांनी केली. यावेळी माणिकराव ठाकरे, जयंत पाटील, पांडुरंग फुंडकर, महादेव जानकर आदींची भाषणे झाली.