शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

दरडोई उत्पन्न वाढले, पण आदिवासी अजूनही उपेक्षितच; सुधीर मुनगंटीवार यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 2:17 AM

राज्यातील ३२ लाख निराधारांसाठी वर्षाला ५ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

- अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न वाढले, जीएसडीपीमध्ये आपण इतर राज्यांच्या पुढे गेलो, मात्र दुसरीकडे भामरागडचे आदिवासी आजही कौलाच्या घरात आणि पत्र्याच्या झोपडीत रहातात, अशी खंत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. राज्यातील ३२ लाख निराधारांसाठी वर्षाला ५ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आजही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१,००० हजार रुपये असल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी निराधार हे तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत असतात, म्हणून मी या लोकांचे मानधन ६०० वरुन १२०० रुपये केले आहे. दिव्यांगांना घर देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. सातव्या वेतन आयोगामुळे राज्याच्या तिजोरीवर २४ हजार कोटींचा बोजा पडला, म्हणून २० हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर करावा लागला, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.अर्थसंकल्पातील घोषणांसाठी पैसा कोठून येणार?२७ फेब्रुवारी रोजी जेव्हा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता, त्याचवेळी या घोषणांची तयारी केली होती. मात्र आचारसंहितेमुळे त्यावेळी जाहीर केले नाही. राज्याचे उत्पन्न आज सव्वातीन लाख कोटी रुपयांवर गेले आहे. त्यामुळे निधीची कमतरता नाही.निवडणूक डोळ्यापुढे ठेवून धनगर समाजासाठी १ हजार कोटीची तरतूद केलीे. याआधी हे का करावे वाटले नाही का? सरकार निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आम्ही निवडणुकांना आमच्या कामाचे बाय प्रॉडक्ट मानतो. आम्ही एलबीटी माफ केला, टोल माफ केला, मराठा आरक्षण दिले, हे सगळे निर्णय काही फक्त निवडणुकांसाठी नव्हते. 

राज्यावर सव्वा चार लाख कोटींचे कर्ज आहे. ऋण काढून सण करण्याचा हा प्रकार नाही का?नाही. कारण कोणतेही कर्ज मोजण्याची पध्दत असते. माणसाच्या शरीरातील रक्त आपण हिमोग्लोबिन किती आहे असे मोजतो, ते लिटरमध्ये मोजत नाही. तसेच राज्यावरील ऋणभार मोजण्याची पध्दत आहे. २००४ साली हा ऋणभार २८ टक्के होता, तो आता १५ टक्के झाला आहे आणि तो मर्यादेच्या आत आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार