शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

तक्षकाला संरक्षण देणाऱ्या इंद्राचं आसन वाचू शकलं नाही, उद्धवजी तुमचं काय वाचणार? भाजपचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 15:09 IST

भाजपकडून मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासूनच राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत मलिक यांनी राजीनामा दिलेला नाही अथवा राज्यातील ठाकरे सरकारनेही त्यांचा राजीनामा घेतलेला नाही.

मुंबई - राज्यातील उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या राजिनाम्याच्या मुद्द्यावरू राज्यातील राजकारण जबरदस्त तापले आहे. आज मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या वतीने मुंबईत मोर्चा काढला जात आहे. मोर्चापूर्वी झालेल्या भाषणात भाजप आमदार आशीष शेलार यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. "अरे तक्षकाला संरक्षण देणाऱ्या इंद्राचं आसन वाचू शकलं नाही, उद्धवजी तुमचं आसंन काय वाचणार? असा सवाल करत शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार तोफ डागली.

भाजपकडून मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासूनच राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत मलिक यांनी राजीनामा दिलेला नाही अथवा राज्यातील ठाकरे सरकारनेही त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. यावरून राज्यातील राजकारण चांगलेच चिघळले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला जात आहे. आझाद मैदान ते मेट्रो थिएटर असे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

शेलार म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात, याकूब मेमनला फाशी देऊ नका, असे म्हणणारा एक लुच्चा मंत्री आहे. याच वेळी त्यांनी आंदोलनासाठी जमलेल्या लोकांना हा मंत्री कोण, अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. तसेच, मलिकांचा राजिनामा घ्या. नवाब मलिकचा राजीनामा घ्यायचाय आहे, असेही ते यावेळी म्हणाते. 

म्हणतात, महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही. अरे पण केवळ तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, असा टोलाही यावेळी शेलार यांनी ठाकरे सरकारला लगावला. यावेळी पुराणातील एक उदाहरण देत, "अरे एकदा इंद्रानेही तक्षक नावाच्या नागाला संरक्षण दिले होते. काय झाले, नंतर इंद्राचे आसनही वाचू शकले नाही. उद्धवजी मग तुमचे आसन काय वाचणार? असा सवालही आषिश शेलार यांनी केला. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाagitationआंदोलन