शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

फडणवीस उद्यापासून काळजीवाहू मुख्यमंत्री राहू शकतात का? काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 8:51 PM

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली.

मुंबई : महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. शरद पवार यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्याशी राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण आणि उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकले. राज्यपाल पुढील काळात कोणते पाऊल उचलतात हे पहावे लागेल. त्यांच्यावर जबाबदारी आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. 

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आमच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी आकडा नाही. जनतेचा कौल पाहता भाजपाने पुढाकार घेऊन सत्ता स्थापन करायला हवी होती. आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राज्यपाल प्रक्रिया सुरू करतील. बिगर भाजपा सरकार यावे ही कल्पना योग्य आहे मात्र ते कसे येणार यावर विचार केलेला नाही. राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे. पवारांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली, असे  थोरात म्हणाले.

काँग्रेस, राष्ट्रवादीची विचारधारा एकच आहे. आम्हाला भाजपाला सत्तेबाहेर ठेवायचे आहे असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले असले तरीही विचार केलेला नाही असे सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले.  

मुख्यमंत्र्यांनी सरकारचा नाकर्तेपणा मान्य केला : पृथ्वीराज चव्हाणगेले 15 दिवस राज्यात अस्थिर परिस्थिती होती, ती संपली आहे. भाजपा सरकार बनवू शकणार नाही याची कबुली त्यांनी दिली आहे. राजीनामा देताना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे म्हटले त्यावर बोलू. त्यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेने त्यांना नाकारले आहे. 220 जागा जिंकण्याची वल्गना फोल ठरली आहे. ते म्हणाले की गेली 4 वर्षे दुष्काळ पडला त्यावर उपाय करण्याऐवजी लाखो कोटींची बुलेट ट्रेन आणत कर्ज वाढवत आहेत. महाराष्ट्र कोलमडलेला असताना सरकार स्थापन करण्यास आणि मित्र पक्षांवर टीका करण्यासाठी वेळ आहे. फडणवीस सरकारने 2 टक्केही कामे पूर्ण केलेली नाहीत. भाजपाने कितीही फोडाफोडी केली तरीही त्यांचे सरकार येणार नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.  राज्यपालांनी लवकरात लवकर राज्याला सरकार द्यावे. मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. मुख्यमंत्री उद्यापासून काळजीवाहू मुख्यमंत्री राहू शकतात का? असा घटनात्मक पेच आहे. यावरही राज्यपालांनी स्पष्टीकरण द्यावे, असे चव्हाण म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAshok Chavanअशोक चव्हाण