शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदावरून नाराजी आणि खातेवाटपाबाबत संजय राऊत यांनी केले मोठे विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 12:04 IST

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे महिनाभर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेरीस 30 डिसेंबर रोजी झाला होता.

मुंबई - उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भावाला स्थान न मिळाल्याने शिवसेना नेते संजय राऊत हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्रिपदावरून असलेली नाराजी आणि खातेवाटपाबाबत मोठे विधान केले आहे. खातेवाटपासून महाविकास आघाडीमध्ये कुठलीही कुरबूर नाही. आज संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या शिवसेना नेत्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधून मार्ग काढती, असेही संकेत राऊत यांनी दिले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे महिनाभर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेरीस 30 डिसेंबर रोजी झाला होता. मात्र या विस्तारामध्ये मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे अनेक नेते नाराज झाले होते. तसेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावणारे संजय राऊत हे सुद्धा भावाला मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगली होती. त्या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्रिपदावरून असलेली नाराजी आणि रखडलेल्या खातेवाटपाबाबत माहिती दिली. संजय राऊत म्हणाले की, ''महाविकास आघाडीमध्ये खातेवाटपावरून कुरबुरी आहे असे म्हणता येणार नाही. पक्षांनुसार खातेवाटप आधीच झालेले आहे. आता जी नाराजी आहे ती त्या त्या पक्षातील अंतर्गत खातेवाटपावरून आहे. हे सरकार तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केले आहे, हे विसरता येणार नाही. तसेच मुख्यमंत्र्यांकडूनही खातेवाटपाबाबत विलंब झालेला नाही. सध्या सुकाणू समितीच्या माध्यमातून समन्वय साधला जात आहे. आज संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होईल.'' 

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेमध्ये निर्माण झालेल्या नाराजीबाबतही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ''मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिवसेनेतील काही नेते नाराज आहेत, हे खरे आहे. पण महाविकास आघाडीती शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह केवळ 15 मंत्रिपदे आली आहेत. त्यातून छोटे मित्रपक्ष आणि अपक्षांनाही शिवसेनेने वाटा दिला आहे. आघाडीतील मोठा पक्ष या नात्याने आम्ही शब्दाला जागून मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. आता मंत्रिपद मिळावे असे प्रत्येकाला वाटत असते, तसे वाटणे हा काही गुन्हा नाही. मात्र आता नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे हे स्वत: लवकरच सर्वांशी बोलतील आणि त्यातून मार्ग काढतील,''असे राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही यावर माझा विश्वास नाही, असे सांगत राऊत यांनी भास्कर जाधव यांना टोला लगावला. तसेच दिवाकर रावते आणि रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. ते मंत्रिपदासाठी तडफड करणारे नाही, असेही राऊत यांनी सांगितले.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊत