शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला; शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 1:19 PM

मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी गेल्या चार-सहा महिन्यांपासून आवई उठविली जात आहे. परंतु, काही केल्या हा विस्तार होत नाहीय.

विधानसभा निवडणुकीला आता अवघे ८-९ महिने राहिलेले असताना शिंदे सरकारमधील तीन तिघाडीमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. बच्चू कडूंसारख्या आमदारांनी तर आता आशाच सोडून दिली आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्तार का रखडला यावर शिंदे गटाच्या मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांनी मोठा दावा केला आहे. 

मंत्रिपदासाठी संजय शिरसाट देखील शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून इच्छुक आहेत. परंतू, त्यानंतर विस्तार होऊनही शिरसाटांना मंत्रिपदाने हुलकावणी दिलेली आहे. दुसरा विस्तार होणार अशी गेल्या चार-सहा महिन्यांपासून आवई उठविली जात आहे. परंतु, काही केल्या हा विस्तार होत नाहीय. भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट अशा तिघांना उरलेली मंत्रिपदे वाटून देण्यावरून तिढा सुटता सुटत नाहीय. त्यातच ज्यांना मिळणार नाही त्यांचीही नाराजी सोसावी लागेल, या पेचामुळे हा विस्तार रखडलेला आहे. असे असताना संजय शिरसाट यांनी जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याचा दावा केला आहे.

जयंत पाटील हे भाजपासोबत येणार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार थांबला होता. भाजपासोबत जाण्याचा प्रस्तावच जयंत पाटलांनी मांडला होता. आमदार आणि आपण सर्व सोबत जाऊन शरद पवारांना हे सांगू अशी चर्चा ही केली होती. आजही पाटील हे शरीराने शरद पवारांसोबत आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.

तसेच जयंत पाटलांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते तिकडेच थांबले आहेत. ते येणार होते म्हणूनच विस्तार थांबला होता, असा दावाही त्यांनी केला. संजय राऊतांवर टीका करताना शिरसाट यांनी त्यांना आता संध्याकाळी रेव्ह पार्टीला जाता येत नसेल, म्हणून ते अशी वक्तव्ये करत असतील असा टोला लगावला. तसेच राम मंदिर हा भाजपाचा कार्यक्रम नाही. सर्व पक्षाचे कारसेवक तिथे होते. सर्व देशवासियांचा राम मंदिर उभारणीत वाटा आहे, असेही शिरसाट म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारJayant Patilजयंत पाटील