शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘सीएए ; विरोधकांनाही हवी आहे अशांतताच : भास्करराव आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 20:38 IST

भाजपचे शरीर स्वत:चे आणि मेंदू मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा

ठळक मुद्दे विकासापासून नागरिकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून गाजरसीएए, एनआरसीचा निर्णय योग्य असला तरी अयोग्यवेळी घेतल्याने संभ्रम

पुणे : देशामध्ये महागाई, मंदी, बेरोजगारी यांसारखे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), भारतीय नागरीकत्व नोंदणी (एनआरसी) आणण्यात आले. विकासापासून नागरिकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजप एक प्रकारे गाजर दाखवितआहे . तर विरोधकांनाही अशांतताच हवी आहे, अशी टीका ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांनी केली. सीएए, एनआरसीचा निर्णय योग्य असला तरी अयोग्यवेळी घेतल्याने संभ्रम निर्माण झाल्याचेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.आयपीजे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शुक्रवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी उद्योजक अजय शिर्के, ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार व अ‍ॅड. नीला गोखले व्यासपीठावर उपस्थित होते. आव्हाड म्हणाले, जगामध्ये खुप असमतोल निर्माण झाला आहे. अमेरिकेसह युरोपातील देशांमध्येही घुसखोरी सुरू आहे. भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भारताची फाळणी धार्मिकतेवर आधारीत होती. वांशिक वादातून बांग्लादेशाची निर्मिती झाली. आता तिथून दररोज घुसखोरी होत आहे. इतर देश घुसखोरांना गोळ््या घालत आहेत. परंतु आपण मानवतेच्या दृष्टीने त्याचा विचार करतो. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशांनी स्वत:ला मुस्लिम राष्ट्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे अशा देशांमधील मुस्लिमांव्यतिरिक्त इतर धर्मियांना संरक्षण देण्यासाठी म्हणून हा कायदा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये हिंदु, बौध्द, जैन, शीख, पारसी, ख्रिश्चन यांचा समावेश आहे. हेच मुद्दे अधिक वादग्रस्त ठरले आहेत. शेजारील तीन देशांमधून आलेल्या मुस्लिमांची चौकशी करूनच त्यांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. घुसखोरांमध्ये सर्वाधिक मुस्लिम आहेत. तसेच विध्वंसक कृत्यांमध्येही त्यांचा सहभाग जास्त आहे. त्यामुळे सीएए, एनआरसी झालेच पाहिजे. पण वेळ कोणती हा वादाचा मुद्दा आहे. त्यामागे राजकीय कारणे आहेत. सध्या तत्वनिष्ठ राजकारण राहिले नाही. हे स्वार्थाचे राजकारण आहे. -------भाजपाचा मेंदु आरएसएस‘सीएए’मधून केवळ मुस्लिम घुसखोरांना वगळण्यात आल्याने हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) अजेंडा असल्याची शंका निर्माण झाली आहे. भाजपचे शरीर स्वत:चे आणि मेंदू मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. हिंदुत्व हा आरएसएसचा अजेंडा असून ही भाजपाची कमकुवत बाजू आहे विरोधकांकडून याचे राजकीय भांडवल केली जात आहे, अशी टीका करत अ‍ॅड. आव्हाड यांनी अशा स्थितीत नागरिकत्व कायदा गंभीरपणे घ्यायला हवा, नागरीकत्व सांभाळायलाच हवे, असे सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकGovernmentसरकारBJPभाजपा