शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘सीएए ; विरोधकांनाही हवी आहे अशांतताच : भास्करराव आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 20:38 IST

भाजपचे शरीर स्वत:चे आणि मेंदू मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा

ठळक मुद्दे विकासापासून नागरिकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून गाजरसीएए, एनआरसीचा निर्णय योग्य असला तरी अयोग्यवेळी घेतल्याने संभ्रम

पुणे : देशामध्ये महागाई, मंदी, बेरोजगारी यांसारखे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), भारतीय नागरीकत्व नोंदणी (एनआरसी) आणण्यात आले. विकासापासून नागरिकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजप एक प्रकारे गाजर दाखवितआहे . तर विरोधकांनाही अशांतताच हवी आहे, अशी टीका ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांनी केली. सीएए, एनआरसीचा निर्णय योग्य असला तरी अयोग्यवेळी घेतल्याने संभ्रम निर्माण झाल्याचेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.आयपीजे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शुक्रवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी उद्योजक अजय शिर्के, ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार व अ‍ॅड. नीला गोखले व्यासपीठावर उपस्थित होते. आव्हाड म्हणाले, जगामध्ये खुप असमतोल निर्माण झाला आहे. अमेरिकेसह युरोपातील देशांमध्येही घुसखोरी सुरू आहे. भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भारताची फाळणी धार्मिकतेवर आधारीत होती. वांशिक वादातून बांग्लादेशाची निर्मिती झाली. आता तिथून दररोज घुसखोरी होत आहे. इतर देश घुसखोरांना गोळ््या घालत आहेत. परंतु आपण मानवतेच्या दृष्टीने त्याचा विचार करतो. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशांनी स्वत:ला मुस्लिम राष्ट्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे अशा देशांमधील मुस्लिमांव्यतिरिक्त इतर धर्मियांना संरक्षण देण्यासाठी म्हणून हा कायदा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये हिंदु, बौध्द, जैन, शीख, पारसी, ख्रिश्चन यांचा समावेश आहे. हेच मुद्दे अधिक वादग्रस्त ठरले आहेत. शेजारील तीन देशांमधून आलेल्या मुस्लिमांची चौकशी करूनच त्यांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. घुसखोरांमध्ये सर्वाधिक मुस्लिम आहेत. तसेच विध्वंसक कृत्यांमध्येही त्यांचा सहभाग जास्त आहे. त्यामुळे सीएए, एनआरसी झालेच पाहिजे. पण वेळ कोणती हा वादाचा मुद्दा आहे. त्यामागे राजकीय कारणे आहेत. सध्या तत्वनिष्ठ राजकारण राहिले नाही. हे स्वार्थाचे राजकारण आहे. -------भाजपाचा मेंदु आरएसएस‘सीएए’मधून केवळ मुस्लिम घुसखोरांना वगळण्यात आल्याने हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) अजेंडा असल्याची शंका निर्माण झाली आहे. भाजपचे शरीर स्वत:चे आणि मेंदू मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. हिंदुत्व हा आरएसएसचा अजेंडा असून ही भाजपाची कमकुवत बाजू आहे विरोधकांकडून याचे राजकीय भांडवल केली जात आहे, अशी टीका करत अ‍ॅड. आव्हाड यांनी अशा स्थितीत नागरिकत्व कायदा गंभीरपणे घ्यायला हवा, नागरीकत्व सांभाळायलाच हवे, असे सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकGovernmentसरकारBJPभाजपा