शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Budget 2020: महानगरांच्या विकासाच्या दृष्टीने अर्थसंकल्प तोकडाच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 4:12 AM

गृहकर्जे, घर खरेदीला चालना मिळण्याची शक्यता

- रमेश प्रभू

शहरांची सुधारणा प्रामुख्याने तेथील नागरी सुविधांवर अवलंबून असते. नागरी सुधारणा, पायाभूत सुखसोयी, निवास व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, शिक्षण इ. बाबींसाठीची तरतूद आणि त्याची योग्य अंमलबजावणी यावरच शहरांची बहुतांश सुधारणा अवलंबून असते. अस्ताव्यस्त वाढलेल्या झोपडपट्ट्या, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती, आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा यामुळे मुंबईची एकेकाळी बकाल शहर म्हणून ओळख होती. परंतु, गेल्या काही वर्षांत मुंबई कात टाकत असून तिची नियोजनबद्ध शहराच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

या वर्षाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी १ कोटी ७० लाखांची तरतूद असली तरी आपल्या संपूर्ण देशाचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता ही तरतूद फारच अपुरी आहे. शहरांच्या स्वच्छतेचा विचार पहिल्यांदाच या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे आणि त्यासाठी ४ हजार ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.शहरांची सुधारणा तेथील घरांवर ओळखली जाते. सध्या मुंबई आणि मुंबई उपनगरसारख्या शहरांत बांधकामांचा वेग मंदावला आहे; किंबहुना ठप्प झाला आहे.

देशाच्या निकोप अर्थव्यवस्थेसाठी निश्चितच हे चांगले लक्षण नाही. याला अनेक घटक कारणीभूत आहेत. पैशांचे विमुद्रीकरण, जीएसटीची गुंतागुंत, नवीन रेरा कायदा आणि बँकांची दिवाळखोरी, वाढलेले जमिनीचे, अधिमूल्याचे दर यामुळे बांधकाम व्यवसाय फायदेशीर ठरत नाही. नवीन घरांच्या वाढलेल्या किमतीमुळे लोकांनाही नवे घर घेणे परवडेनासे झाले आहे.

दिलासादायक म्हणजे या अर्थसंकल्पात वर्षाला ५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल. त्यांची क्रयशक्ती वाढून घरांसाठी कर्ज घेणे व त्याचे हप्ते भरणे त्यांच्या खिशाला परवडणारे आहे.या अर्थसंकल्पात घरबांधणी उद्योगाला संजीवनी देण्यासाठी ठोस पाऊल उचललेले नाही, त्यामुळे शहरांची सुधारणा ही अर्धवटच राहणार आहे.

टॅग्स :budget 2020बजेटbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाMaharashtraमहाराष्ट्रNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन