शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Budget 2020: कृषीसाठीच्या तरतुदी अपुऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 03:30 IST

देशातील लोकांनी प्रचंड मोठ्या आशेने मोदी सरकारला पुन्हा निवडून दिले.

- प्रा. सुभाष दगडे

कृषी सिंचन, कृषीउद्योग, कृषीपूरकउद्योग, दुष्काळ निवारण, शेतमाल हमीभाव, शेतकरी आत्महत्या, स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आदींच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पातील तरतुदी अपुºया आहेत. देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासाला संजीवनी देण्यासाठी कृषी क्षेत्राचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणे अत्यंत आवश्यक आहे.

देशातील लोकांनी प्रचंड मोठ्या आशेने मोदी सरकारला पुन्हा निवडून दिले. सरकार देशातील शेती व्यवस्थेच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल, अशी अपेक्षा होती. परंतु सरकारने शेतीच्या संरचनात्मक विकासाकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष केले आहे, हे २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील कृषी सिंचन आणि ग्रामीण विकासासाठी केलेल्या आर्थिक तरतुदींवरून लक्षात येते. सरकार शेती, सिंचन आणि ग्रामीण विकासासाठी काही ठोस निर्णय म्हणून डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील राहील, असे वाटले होते; परंतु सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेती आणि शेतकºयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

२०२०-२१ च्या अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत १६ कलमी कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यामुळे शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट होईल, असा आशावाद प्रकट केला आहे. त्यासाठी शेतकºयांना शेतीबरोबरच जोड व्यवसाय करावे लागतील. शेतकºयांच्या उत्पादनाला ५० टक्के नफा देणारे भाव द्यायला पाहिजे. शेतीमालाला हमीभावाची शाश्वती द्यायला हवी आहे. परंतु २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात शेतमालाच्या हमीभावाबद्दल दखल घेतली नाही. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेती तंत्रज्ञान, शेती संशोधन, शेती संरचनात्मक सुविधा याबाबतीत सर्वांगीण विचार केलेला दिसून येत नाही.

उत्पादन क्षमता वाढविणारे तंत्रज्ञान, अधिक पीक देणाºया पिकांच्या जातीचे संशोधन, शेतीची साठवणूक क्षमता वाढविणारे गोदाम, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग याबाबतीत काही विचार झालेला नाहीे. शेती विकासासाठी शेतकºयांना १५ लाख कोटी रुपये कर्जाची तरतूद करण्यात आली असली तरी, ती एकूण शेती क्षेत्राचा विचार करता तुटपुंजी आहे.

कृषी उडाण योजना, कुसूम योजना, किसान रेल, शेतकरी विमा योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना, सागर मित्र योजना अशा अनेक योजना राबविल्या जाणार आहेत; परंतु प्रत्यक्षात त्या योजनांचा फायदा अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, सीमांत शेतकरी, लहान शेतकºयांना किती होणार आहे? फळबाग शेती विकासासाठी योजना राबविणार आहेत. त्याचा फायदामोठ्या बागायतदारांना अधिक होईल. अर्थसंकल्पातशेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून १०० जिल्ह्यांसाठी व्यापक उपाययोजना राबविणार आहे. देशपातळीवर ६४ टक्के शेतजमिनीला पाणी पुरवठा करणे आवश्यक असताना, केवळ पाणी कमतरता असलेल्या १०० जिल्ह्यांचा विचार करणे योग्य नाही. जास्तीत-जास्त जमीन पाण्याखाली आणण्यासाठी योजना हवी.

टॅग्स :budget 2020बजेटbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र