शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 06:35 IST

बीकेसी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी खा. संजय राऊत, काँग्रेसच्या  खा. वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

मुंबई :  राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, महागाईचा आगडोंब उसळला आहे, हे सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरले आहे. आमचे सरकार सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देऊ, महागाई नियंत्रणात आणू, तसेच प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देऊ, अशा घोषणा उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केल्या. 

बीकेसी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी खा. संजय राऊत, काँग्रेसच्या  खा. वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. “मराठी माणसाची मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला आहे. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे सुरू आहेत. मुंबईची ब्ल्यू प्रिंट नीती आयोगाला देऊन महापालिकेचे महत्त्व कमी करण्याचा डाव आहे. पण, मुंबईवर घाला घालण्याचा प्रयत्न केलात तर याद राखा”, असा इशारा ठाकरे यांनी दिला. 

निवडणुकीच्या प्रचाराबरोबरच सोमवारी महायुतीच्या प्रचाराच्या थापासुद्धा थंडावणार आहेत. त्यांनी केलेल्या घोषणासुद्धा त्यांच्यासारख्याच फसव्या आहेत. परंतु, आम्ही जनतेला दिलेल्या वचननाम्यामधील प्रत्येक वचनामागे पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्रात प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देण्याचा आम्ही वादा केला आहे. कारण, आम्हाला महाराष्ट्र घडवायचा आहे, असेही ठाकरे म्हणाले.

...तर एमएमआरडीएसुद्धा रद्द करू! 

धारावी  आणि आसपासचा परिसर, मिठागरे, वीज अदानीला, बंदरे अदानीची, विमानतळ अदानीकडे,  त्यामुळे अदानीची सुलतानी आता संपवायला पाहिजे, असे यावेळी ठाकरे म्हणाले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि एमएमआरडीए यांच्यात करार केला जात आहे. मुंबई संपवणार असाल तर आम्ही सत्तेत येताच एमएमआरडीएसुद्धा रद्द करू, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

सात हजार रुपये सोयाबीनला देणार 

महायुतीच्या  सरकारने शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले असून, शेतमालाला भाव मिळत नाही. आमचे सरकार असताना आम्ही सोयाबीनला साडेसहा हजार रुपये भाव दिला होता. आता पुन्हा सत्तेत येतात सोयाबीनला सात हजार रुपयांचा भाव देऊ, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. 

वाढवण, मुरबे बंदर रद्द करण्यासाठी संधी द्या!

पालघर/बोईसर : वाढवण आणि मुरबे ही बंदरे कायमची रद्द करण्याची ही शेवटची संधी असून, तुम्ही आमचे दोन उमेदवार निवडून आणा, आमचे सरकार निवडून आल्यास कोणत्याही परिस्थितीत मी ही बंदरे होऊ देणार नाही. हा माझा शब्द आहे, अशी ग्वाही उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोईसर येथे प्रचारसभेत दिले. 

महाविकास आघाडीचे पालघरचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि बोईसरचे उमेदवार डॉ. विश्वास वळवी यांच्या प्रचारासाठी ठाकरे बोईसर येथे आले होते. यावेळी त्यांनी वाढवणचा मुद्दा प्रकर्षाने मांडत यावेळी जर मशाल पेटली नाही, तर तुमच्या डोक्यावर वाढवणचा वरवंटा फिरवला जाईल, असा इशारा दिला.

पालघरमध्ये चिंतामण वनगांच्या घराचा आदर ठेवीत श्रीनिवासला निवडून आणले आणि तो तिकडे गेला. आता त्याचा वापर करून त्याला कसा फेकून दिला हे बघताच, अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती