शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 06:35 IST

बीकेसी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी खा. संजय राऊत, काँग्रेसच्या  खा. वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

मुंबई :  राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, महागाईचा आगडोंब उसळला आहे, हे सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरले आहे. आमचे सरकार सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देऊ, महागाई नियंत्रणात आणू, तसेच प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देऊ, अशा घोषणा उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केल्या. 

बीकेसी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी खा. संजय राऊत, काँग्रेसच्या  खा. वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. “मराठी माणसाची मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला आहे. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे सुरू आहेत. मुंबईची ब्ल्यू प्रिंट नीती आयोगाला देऊन महापालिकेचे महत्त्व कमी करण्याचा डाव आहे. पण, मुंबईवर घाला घालण्याचा प्रयत्न केलात तर याद राखा”, असा इशारा ठाकरे यांनी दिला. 

निवडणुकीच्या प्रचाराबरोबरच सोमवारी महायुतीच्या प्रचाराच्या थापासुद्धा थंडावणार आहेत. त्यांनी केलेल्या घोषणासुद्धा त्यांच्यासारख्याच फसव्या आहेत. परंतु, आम्ही जनतेला दिलेल्या वचननाम्यामधील प्रत्येक वचनामागे पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्रात प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देण्याचा आम्ही वादा केला आहे. कारण, आम्हाला महाराष्ट्र घडवायचा आहे, असेही ठाकरे म्हणाले.

...तर एमएमआरडीएसुद्धा रद्द करू! 

धारावी  आणि आसपासचा परिसर, मिठागरे, वीज अदानीला, बंदरे अदानीची, विमानतळ अदानीकडे,  त्यामुळे अदानीची सुलतानी आता संपवायला पाहिजे, असे यावेळी ठाकरे म्हणाले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि एमएमआरडीए यांच्यात करार केला जात आहे. मुंबई संपवणार असाल तर आम्ही सत्तेत येताच एमएमआरडीएसुद्धा रद्द करू, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

सात हजार रुपये सोयाबीनला देणार 

महायुतीच्या  सरकारने शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले असून, शेतमालाला भाव मिळत नाही. आमचे सरकार असताना आम्ही सोयाबीनला साडेसहा हजार रुपये भाव दिला होता. आता पुन्हा सत्तेत येतात सोयाबीनला सात हजार रुपयांचा भाव देऊ, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. 

वाढवण, मुरबे बंदर रद्द करण्यासाठी संधी द्या!

पालघर/बोईसर : वाढवण आणि मुरबे ही बंदरे कायमची रद्द करण्याची ही शेवटची संधी असून, तुम्ही आमचे दोन उमेदवार निवडून आणा, आमचे सरकार निवडून आल्यास कोणत्याही परिस्थितीत मी ही बंदरे होऊ देणार नाही. हा माझा शब्द आहे, अशी ग्वाही उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोईसर येथे प्रचारसभेत दिले. 

महाविकास आघाडीचे पालघरचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि बोईसरचे उमेदवार डॉ. विश्वास वळवी यांच्या प्रचारासाठी ठाकरे बोईसर येथे आले होते. यावेळी त्यांनी वाढवणचा मुद्दा प्रकर्षाने मांडत यावेळी जर मशाल पेटली नाही, तर तुमच्या डोक्यावर वाढवणचा वरवंटा फिरवला जाईल, असा इशारा दिला.

पालघरमध्ये चिंतामण वनगांच्या घराचा आदर ठेवीत श्रीनिवासला निवडून आणले आणि तो तिकडे गेला. आता त्याचा वापर करून त्याला कसा फेकून दिला हे बघताच, अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती