शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Breaking: उदयनराजेंच्या पुनर्वसनाची भाजप नेत्यांमध्ये चर्चा; काय मिळणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 22:03 IST

राष्ट्रपती राजवट लागू नये ही भाजपची इच्छा होती. मात्र, दोन्ही प्रादेशिक पक्षांत अंतर निर्माण झाल्याने समज-गैरसमज झाल्यानेच राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याला शिवसेनेला जबाबदार धरणे योग्य नाही.

माढा : अवघ्या चारच महिन्यांमध्ये राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात जाणाऱ्या उदयनराजेंना पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला. उदयनराजेंचे राज्यात किंवा केंद्रात पुनर्वसन करण्याचा विचार भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू झाला असून याबाबतचे मोठे वक्तव्य माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे. 

राष्ट्रपती राजवट लागू नये ही भाजपची इच्छा होती. मात्र, दोन्ही प्रादेशिक पक्षांत अंतर निर्माण झाल्याने समज-गैरसमज झाल्यानेच राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याला शिवसेनेला जबाबदार धरणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे संजय बाबा कोकाटे, भाजपचे राजकुमार पाटील, टायगर ग्रुपचे तानाजी जाधव राजाभाऊ चवरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कुबड्यावरील हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे आकलन माझ्यापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच चांगले आहे. त्यामुळे शिवसेनेने महायुतीच्या जनमताचा आदर करून भाजप सोबत सरकार स्थापण्यास एक पाऊल पुढे टाकल्यास निश्चित महायुतीचे सरकार बनेल. सेना-भाजप हे घरातील भांडण असून हे लवकरच मिळेल, असा आशावाद माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. 

याचबरोबर त्यांनी उदयनराजेंबाबतही भाष्य केले. माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यात महत्वाचे पद किंवा राज्यसभेत पुनर्वसन करण्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडींनुसार राज्यात पद मिळाले नाही तर राज्यसभेचे सदस्यत्व उदयनराजेंना मिळण्याची शक्यता आहे. 

उदयनराजेंबाबत सांगताना त्यांनी मोहिते-पाटील कुटुंबीयांचे देखील एप्रिल महिन्यापर्यंत पुनर्वसन केल्याची बातमी ऐकायला मिळेल, असे सुतोवाच केले. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSolapurसोलापूरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ranjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस