शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

अनधिकृत बांधकामांना पालिकेचाच आशीर्वाद

By admin | Updated: July 31, 2016 00:58 IST

आधी अनधिकृत बांधकाम करून घ्यायचे व नंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने ते अधिकृत करून घ्यायचे

पुणे : आधी अनधिकृत बांधकाम करून घ्यायचे व नंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने ते अधिकृत करून घ्यायचे, याच पद्धतीने सध्या शहरातील बहुसंख्य मोठ्या वसाहतींची बांधकामे सुरू आहेत. तक्रारी आल्या तरच अशा बांधकामांना नोटीस पाठवायची, असा बांधकाम विभागाचा ‘खाक्या’ आहे. वारंवार तक्रारी होत असूनही हीच पद्धत फायदेशीर असल्याने त्यात बदल करायला पालिकेचा बांधकाम विभाग तयार नाही.रिवाईज प्लॅन म्हणजे आधी दिलेल्या आराखड्यात बदल करण्याची परवानगी मागणे. असे असंख्य अर्ज बांधकाम विभागात आहेत. हा बदल म्हणजे फक्त वाढीव मजलाच नव्हे, तर मूळ प्लॅनमध्ये नसलेली गॅलरी तयार करणे, वाहनतळ दाखविलेल्या ठिकाणी बांधकाम करणे, जिन्यांचे आकार बदलणे, त्यांचे स्थान बदलणे असा अनेक प्रकारांचा बदल असतो. तो तपासून घेण्याची काळजीही बांधकाम विभागाकडून दाखविली जात नाही. संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांनी दिलेले सर्टिफिकेट प्रमाण मानून पालिकेकडून ही बांधकामे अधिकृत करून दिली जातात.झालेले बांधकाम परवानगी दिलेल्या आराखड्याप्रमाणे आहे किंवा नाही हे पालिकेकडून तपासलेच जात नाही. त्यासाठी पालिकेकडे ३० बिल्डिंग इन्स्पेक्टर आहेत. शहराचे विभाग करून त्यांना त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करून दिलेले आहे. त्यांनी पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी (कम्प्लिशन सर्टिफिकेट) आलेल्या प्रत्येक बांधकामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करणे अपेक्षित आहे. अशी तपासणी होतच नाही. बांधकाम व्यावसायिकाने दिलेली कागदपत्रे पाहूनच प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळेच शहरात अशा अनधिकृत बांधकामांचे, मजल्यांचे पेवच फुटले आहे. आमचे काम बांधकामाला परवानगी देण्याचे आहे, बांधकामाचा दर्जा तपासण्याचे नाही, असेच बांधकाम विभागाकडून सांगण्यात येते. ती सर्व जबाबदारी बांधकाम व्यावसायिकाची आहे, पालिकेची नाही, अशीच त्यांची भूमिका असते. वास्तविक अनधिकृत बांधकामांना नोटीस बजावणे, ते सुरू असतानाच थांबविणे, बांधकाम मूळ आराखड्याप्रमाणे आहे किंवा नाही याची बांधकाम सुरू असतानाच वेगवेगळ्या टप्प्यावर तपासणी करणे ही जबाबदारी बांधकाम विभागाचीच आहे. त्यांच्याकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच शहरात अशा अनधिकृत बांधकामांची संख्या वाढली आहे. (प्रतिनिधी)>संपूर्ण शहरासाठी अवघे ३० इमारत निरीक्षकशहरातील नव्या बांधकामांची संख्या पाहता ३० बिल्डिंग इन्स्पेक्टरकडून प्रत्येक बांधकामाची तपासणी करणे अशक्य आहे, असा बचाव बांधकाम विभागाकडून आता करण्यात येत आहे. मात्र त्यांची संख्या वाढवून घेण्याऐवजी सध्या आहे तसेच काम सुरू राहावे, असाच त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसते आहे.फक्त १२ मजल्यांची परवानगी असताना १३ वा मजला बांधण्याचे धाडस पालिकेच्या बांधकाम विभागाच्या या कार्यपद्धतीमुळेच झाले आहे. बंगला किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या बांधकामांना या विभागाकडून सतराशे साठ नियम सांगितले जातात व कायदे दाखविले जातात. मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना मात्र पूर्ण मोकळीक असते. अशी कामे करून घेणाऱ्या त्यांच्या प्रतिनिधींचीच पालिकेच्या बांधकाम विभागात सततची गर्दी असते. त्यांनी साहेबांच्या मागे फिरण्याऐवजी साहेबांचा शिपाईच त्यांना शोधत फिरत असतो. कोण, कधी येणार, कशासाठी येणार, याची सर्व माहिती त्यांच्याकडे असते.