शहरं
Join us  
Trending Stories
1
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
2
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
3
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
4
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
5
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
6
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
7
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
8
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
9
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
10
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
11
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
12
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
13
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
14
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
15
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
16
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
17
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
19
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
20
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
Daily Top 2Weekly Top 5

Shankarrao Gadakh: कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरून मविआमधील मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर भाजपाचे गंभीर आरोप, केली राजीनाम्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 14:16 IST

BJP's serious allegations on Shankarrao Gadakh: मंत्र्यांचा पीए म्हणवणाऱ्या एका तरुणाने व्हिडीओ तयार करून आत्महत्या केली असून, या आत्महत्येवरून भाजपाने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामधील आरोप-प्रत्यारोप गेल्या काही दिवासांपासून टोकाला गेले आहेत. दरम्यान, आज भाजपाने राज्य सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्र्यांचा पीए म्हणवणाऱ्या एका तरुणाने व्हिडीओ तयार करून आत्महत्या केली असून, या आत्महत्येवरून भाजपाने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणी गडाख यांनी राजीनामा द्यावा, तसेच त्यांनी राजीनामा न दिल्यास सरकारने त्यांना तत्काळ पदावरून दूर करावे, अशी मागणी भाजपाने केली आहे.

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले आहेत. उपाध्ये म्हणाले की, मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे कर्मचारी असलेल्या एका तरुणाने मंत्री गडाख यांच नाव घेत आत्महत्या केली आहे. प्रतीक बाळासाहेब काळे असे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ बनवला होता. त्यामध्ये त्याने आपण मंत्र्यांकडे पीए असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच मी तुमच्याकडे सहा वर्षे काम केले, माझी बदनामी का करता असा प्रश्नही विचारला होता. या प्रकरणात त्या तरुणाने तयार केलेल्या व्हिडीओमध्ये साधारण दहा जणांची नावे त्याने घेतली आहेत. मात्र पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. दहा जणांची नावं घेतल्यानंतरही केवळी सात जणांवरच गुन्हा दाखल झाला आहे, पण तीन नावांबद्दल पोलिसांनी अळी मिळी गुप चिळी साधली आहे, असा दावा उपाध्येंनी केला आहे.

ते पुढे म्हणतात की, अशा प्रकारे राज्य सरकारमध्ये जलसंधारणासारखं महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या शंकरराव गडाख यांचं नाव घेऊन कुणी आत्महत्या करत असेल आणि त्याची चौकशी होणार नसेल तर ती शोकांतिका आहे. महाराष्ट्रामध्ये आता लोक मंत्र्यांचं नाव घेऊन आत्महत्या करायला लागले आहेत. याआधी एका मंत्र्याशी संबंधित तरुणीने आत्महत्या केली होती. आता एका मंत्र्याच्या पीएने आत्महत्या केली आहे. ३० तारखेला ही घटना घडली. या घटनेनंतर नगर जिल्ह्यामध्ये असंतोषाचं वातावरण आहे. वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचे बोलले जात आहे, असे ते पुढे म्हणाले.

त्यामुळे सत्तारुढ पक्षाचे लोक दबाव आणत असल्याने प्रतीक बाळासाहेब पाटील यांना न्याय मिळणार का, हा आमचा पहिला प्रश्न आहे. सत्तारुढ पक्ष आहे, शिवसेनेचे मंत्री आहेत म्हणून ते राज्यात काहीही करू शकतात, अशा प्रकारची भूमिका सत्तारुढ पक्षाची आहे का? त्यामुळे प्रतीक काळे याला न्याय द्याचया असेल, तर शंकरराव गडाख यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. तसेच ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी सरकारने त्यांना बाजूला केले पाहिजे. ते मंत्रिपदावर असताना पोलीस कारवाई करायला धजत नाहीत, असे चित्र आहे, जोवर ते मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही. असे ते म्हणाले. तसेच जर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यास टाळाटाळ केली तर भाजपा या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करेल. प्रतीक काळेला आत्महत्या करण्याची वेळ का आली? यामागे कोण आहे हे सगळं समोर आलं पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.असेही उपाध्ये यांनी सांगितले.   

टॅग्स :Shankarrao Gadakhशंकरराव गडाखMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाPoliticsराजकारण