शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

"...तोपर्यंत या देशातून भाजपची सत्ता जाणार नाही", जयंत पाटील नेमकं काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 17:06 IST

Jayant Patil NDA Government : धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचे आवाहन केले.

Maharashtra Vidhan Sabha election 2024 : "भाग्यश्री ताई चिंता करू नका. तुम्हाला तुमच्या वडिलांनी अंतर दिले असले, तरी शरद पवार साहेब तुम्हाला अंतर देणार नाही. ताकदीने पाठिंबा देतील, हा माझा विश्वास आहे", असे सांगतानाच जयंत पाटील यांनी दिल्लीतील सरकार घालवण्यासाठी भाजपला आणखी धक्का देण्याचे आवाहन केले. भाग्यश्री आत्राम यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.    

अहेरी येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले, "महाराष्ट्र आणि भारतातील आदिवासींना आपल्या हक्काची जाणीव झाली आहे. लोकसभेसाठी जेव्हा भाजप तुमच्याकडे मते मागायला आला. तेव्हा तुम्ही त्यांचा कावा ओळखला. या देशात आदिवासींना पंडित नेहरूंपासून विकासासाठी जी संरक्षणे दिली गेली होती. ती आरक्षण असो वा अन्य. ती संरक्षणे काढून घेण्याचा विचार या भाजप करत आहे. या देशाची घटना बदलण्याचे पाप यांच्या मनात आहे. याची खात्री झाल्यानंतर या मतदारसंघात भाजपचा पराभव केला." 

विधानसभेला भाजपला धक्का द्यायचा आहे -जयंत पाटील

"नरेंद्र मोदींनी दिल्लीचे सरकार स्थापन केले. दोन राज्यातील चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्याने. म्हणून आता विधानसभेत भाजपला आणखी एक धक्का द्यायचा आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात-मुंबईतील त्यांचे सरकार जात नाही, तोपर्यंत या देशातून भाजपची सत्ता जाणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार प्रत्येक मतदारसंघात विजयी करण्याची आपली जबाबदारी आहे", असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले.  

"...म्हणून भाग्यश्री आत्रामांचा पक्षप्रवेश लांबला", जयंत पाटलांनी सांगितले कारण

भाग्यश्री आत्राम यांच्या पक्षप्रवेशाबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, "या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आपण विजयी केला. तो उमेदवार भाजपकडे निघालेला. आमच्या भाग्यश्री ताईंनी आणि इथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना खेचून मागे आणले आणि आपण त्यांना आमदार केले."

"बाबा मनाने कधीच तिकडे गेले होते. पण, त्यांची मुलगी कधीही भाजपच्या वळचणीला जाऊन बसली नाही. ती त्यांच्यापासून चार हात लांब राहिली. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही लोकं फुटून तिकडे गेले, तेव्हापासून भाग्यश्री ताई आम्हाला आणि पवार साहेबांना सांगत होत्या की, जे चाललंय ते मला मान्य नाही. मला तुमच्याकडेच राहायचे आहे", असे पडद्यामागची गोष्ट जयंत पाटलांनी सांगितली. 

जयंत पाटील म्हणाले, "आम्ही त्यांना सांगितले की, तुमचे वडील तिकडे गेले आहेत, तर तुम्ही त्यांच्याबरोबर राहा. पण, त्या म्हणाल्या मला तो मार्ग पसंत नाही. प्रसंगी मी वडिलांशी संघर्ष करेल, पण महाविकास आघाडीमध्येच काम करण्याची माझी इच्छा आहे. आम्हीच चालढकल केली आणि दोन-चार महिने लांबवले. का, तर आम्हाला बघायचे होते की, भाग्यश्री ताई त्यांच्या विचारावर ठाम राहणार आहेत की नाही."

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबई