शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-सेनेसोबत कदापि जाणार नाही!

By admin | Updated: January 19, 2017 00:07 IST

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही एका पक्षाच्या हाती सत्ता येणे शक्य नाही.

मुंबई : राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही एका पक्षाच्या हाती सत्ता येणे शक्य नाही. आघाडी, किंवा युती करुनच सत्ता स्थापन करावी लागेल. मात्र, असे असले तरी जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक निकालानंतर कोणत्याही परिस्थितीत आम्ही भाजपा, शिवसेनेसोबत जाणार नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केली. शिवाय, काँग्रेसनेदेखील आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या ‘लोकमत’ कार्यालयात संपादकीय विभागाशी त्यांनी संवाद साधला. नोटाबंदीमुळे सरकारच्या विरोधात कमालीचा रोष असून तो या निवडणुकीत व्यक्त होईल, असा दावाही तटकरे यांनी केला.शरद पवार यांची नरेंद्र मोदींशी असलेली मैत्री आणि विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला देऊ केलेला पाठिंबा, यामुळे राष्ट्रवादीविषयी कायम संभ्रम राहतो. त्याचे काय?- १९९९ सालापासून आमच्याविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे; पण त्या वेळी स्वतंत्र लढूनदेखील आम्ही काँग्रेससोबत आघाडी केली. वस्तुत: आमच्यापुढे इतर पर्याय खुले होते. त्या वेळी जे घडले नाही ते आता कसे घडेल? गेल्या दोन वर्षात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत या सरकारच्या विरोधात सगळ्यात जास्त भूमिका राष्ट्रवादीने घेतली, ३५ वर्षांनंतर शरद पवार स्वत: रस्त्यावर उतरले. प्रदेश राष्ट्रवादीने राज्यभर जेलभरो आंदोलन केले, जर आमची भाजपाशी मैत्री असती, तर हे झाले असते का? शरद पवार यांना केवळ मोदीच नाही देशातले सगळे नेते मान देतात, हे त्यांचे कर्तृत्व आहे; पण बोलणाऱ्यांचे तोंड कसे बंद करणार? जे स्वत: काहीही करत नाहीत आणि दुसऱ्यांची वैगुण्ये दाखवतात.- नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आघाडीबाबत सकारात्मक असताना कोणाची अडचण आहे? - आम्ही सकारात्मक आहोत, असे बोलून प्रश्न सुटणार नाही. अशोक चव्हाण यांनी राज्य पातळीवरून आघाडी करण्याची भूमिका जाहीर केली असती तर पुढे प्रश्नच उरला नसता; पण आता जिल्हा पातळीवर आघाडी करण्याची भूमिका घेतल्याने त्या त्या जिल्ह्यात जे ठरेल ते ठरेल... नांदेड, पुणे, ठाणे, सोलापूर, सांगली अशा अनेक जिल्ह्यांत आमची बोलणी चालू आहेत. आघाडीच्या विरोधाचा केंद्रबिंदू सातारा आहे. एवढेच मी म्हणेन...- आपला इशारा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे का?सर्वांनाच ते माहीत आहे. स्वच्छ प्रतिमेचा नारा देत ज्यांनी काँग्रेसला ४२ वर आणून ठेवले, त्यांनी दुसऱ्याच्या घराकडे बोट दाखवू नये.- राज्यातील सत्तांतराचे श्रेय नरेंद्र मोदींचे की पृथ्वीराज बाबांचे?- मला जे म्हणायचे ते मी बोललोच आहे...- मुंबईचे घोडे कोणामुळे अडले? इथे काय अडचण आहे?- मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दोन महिनेआधी आघाडी करणार नाही, असे जाहीर करून टाकले. त्यानंतरच आम्ही आमचे उमेदवार जाहीर केले; पण आमच्या यादी जाहीर करण्यावर अशोक चव्हाण नाराज झाले. याचा अर्थ निरुपम त्यांचे ऐकत नसावेत, किंवा जे काही घडले त्यापासून चव्हाण अनभिज्ञ असावेत अथवा त्यांचे मुंबई काँग्रेसमध्ये ऐकले जात नसावे. - विरोधी पक्षाची जागा शिवसेनेनेच भरून काढली आहे. तुमची काय भूमिका आहे? - शिवसेनेने विरोधकांची भूमिकादेखील बजावलेली नाही, तर ती त्यांची दुटप्पी भूमिका आहे. सत्तेत राहून सत्तेचे सगळे फायदे लाटायचे आणि पुन्हा त्याच सरकारमधल्या मुख्य सहयोगी पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायची किंवा नोटाबंदीला विरोध करायचा आणि केंद्रात मंत्रिपदही भूषवायचे हा दुट्टपीपणा आहे. राजकारणात हे फार काळ टिकत नाही. - पिंपरी-चिंचवडमधील तुमचे काही नेते भाजपात गेले, पुण्यात आघाडीत बिघाडी आहे, त्याचे काय?पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येणार हे पक्के आहे. कारण अजित पवार यांनी तेथे प्रचंड काम केलेले आहे. नेते जरी गेले तरी जनता आमच्यासोबत आहे. पुण्यात काँग्रेसने ९१-७१ चा प्रस्ताव पाठवला आहे. तर आम्ही त्यांना ११६ जागा राष्ट्रवादीला आणि ४६ जागा काँग्रेसला असा प्रस्ताव पाठवला आहे; पण अशी पत्रापत्री करण्यापेक्षा समोरासमोर बसून चर्चा करावी अशी आमची भूमिका आहे.-कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढविणार?-मुद्दे खूप आहेत. भाजपा-सेनेचे सरकार सत्तेवर येऊन आता अडीच वर्षे झाली आहेत. सरकारविषयी शेतकरी, कष्टकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. त्यात नोटाबंदीच्या निर्णयाची भर पडली आहे. नोटाबंदीमुळे कामगार वर्ग, शेतकरी देशोधडीला लागला आहे. या सर्व मुद्द्यांवर आम्ही सरकारचा पंचनामा करू. (शब्दांकन: अतुल कुलकर्णी)