शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

भाजपला प्रतीक्षा महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याची ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 1:09 PM

खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सरकार अल्पअवधीचं सरकार असल्याचे म्हटले आहे. तीन पक्षांनी मिळून केलेले सरकार म्हणजे एटो रिक्शा असल्याचं सांगत हे अधिक काळ चालू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

मुंबई - भाजपनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मिळून स्थापन केलेले सरकार पाडण्यात महाविकास आघाडीला यश आले. त्यानंतर महाविकास आघाडीने सरकार स्थापन करत राजकीय समिकरणेच बदलून टाकले. मात्र तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेले सरकार अधिककाळ टिकनार नाही, अशीच भावना भाजप नेत्यांची आहे. आतापर्यंत भाजपच्या आघाडीच्या सर्वच नेत्यांनी सरकार लवकरच कोसळेल अशी भावना व्यक्त करून दाखवली आहे. 

खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सरकार अल्पअवधीचं सरकार असल्याचे म्हटले आहे. तीन पक्षांनी मिळून केलेले सरकार म्हणजे एटो रिक्शा असल्याचं सांगत हे अधिक काळ चालू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

त्यापाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील त्याचीच पुनरावृत्ती केली. पाटील हे पहिल्या दिवशीपासून शिवसेनेवर टीका करत आले आहे. तसेच हे अल्पअवधीचे सरकार असल्याचा पुनरोच्चार करत आहेत. हे सरकार पाडायची गरजस नसून हे आपोआपच पडले असं भाकीत त्यांनी केले आहे. तर माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील महाविकास आघाडीतील नाराजीकडे लक्ष वेधताना सरकार कोसळण्यास सुरुवात झाल्याचा उल्लेख केला होता.

मुनगंटीवार यांच्याआधी भाजप खासदार प्रितम मुंडे यांनी देखील हे सरकार जावून राज्यात पुन्हा भाजपच सत्तारूढ होईल, असा दावा केला होता. भिन्न विचारसरणी असल्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असं म्हटले होते. भाजपचे इतर नेतेही महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार याच विचारात आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याऐवजी विरोधकांना सरकार कोसळण्याचीच अधिक प्रतीक्षा असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.