शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

BJP vs Mahavikas Aaghadi: "निवडणुका जवळ आल्या की आराखडयांचे 'मोती साबण' बाहेर काढले जातात"; Ashish Shelar यांचा Uddhav Thackeray सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 14:36 IST

पाकिस्तानी एजंट, जागतिक पातळीच्या घोटाळेबाजांसोबत BESTच्या ई-बसचा व्यवहार का? असा सवालही शेलारांनी विधनसभेत उपस्थित केला.

BJP vs Mahavikas Aaghadi | मुंबई: युरोपियन युनियनसह जगातील अनेक देशांनी घोटाळेबाज म्हणून घोषित केलेल्या आणि  पनामा पेपर्समध्ये नाव आलेल्या पाकिस्तानी एजंटचा पैसा असलेल्या कंपनीला मुंबईच्या BEST च्या ई-बसचे कंत्राट देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी विधानसभेत केला. तसेच, महाराष्ट्रातून १ हजार कोटींचे बांबूचे जंगल गायब झाले आणि माहूल येथील पर्यावरणाच्या विषयात सरकारने प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांना अप्रत्यक्ष मदत कशी केली, याबाबतची माहितीही आशिष शेलार यांनी विधानसभेत उघड केली. तसेच, निवडणुका (Elections) जवळ आल्या की आराखडयांचे मोती साबण बाहेर काढून मतदारांची दिशाभूल केली जाते, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या महाविकास आघाडी सरकारला लगावला.

अर्थसंकल्पाच्या विभागवार चर्चेदरम्यान आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले, नुकतंच बेस्टच्या ताफ्यामध्ये नव्या ई बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बसचे पहिले टेंडर हे केवळ २०० बससाठी काढण्यात आले होते. शिवाय पुन्हा बसची संख्या वाढवून ती ९०० करण्यात आली. नंतर पुन्हा १४०० बसेस करण्यात आली. मुंबईतील रस्त्यावर चाचणी न घेता एवढया बस घेण्याचा निर्णय योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे. पण हा व्यवहार ज्या कंपनीशी करण्यात आला, त्या व्यवहारावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

बेस्टसाठी १४०० बस कॉसीस ई मोबिलिटी या परदेशी कंपनीकडून घेण्याचा निर्णय करण्यात आला. राज्य शासनाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत या बाबतचा करार १ आक्टोबर २०२१ला केला. या कंपनीला २ हजार ८०० कोटी रूपये देण्याचे मान्य करण्यात आले. या कंपनीचा सीईओ हा कॅनडातील नागरिक असून त्याचे नाव तुमुलूरी असं आहे. तुमुलूरी याला जागतिक पातळीवर घोटाळेबाज म्हणून घोषित केलं आहे. हजारो कोंटीच्या घोटाळ्यात फरार व मुख्य आरोपी असलेल्या व्यक्तीच्या कंपनीशी व्यवहार का केला? असा सवालही त्यांनी केला. तसेच या व्यक्तीच्या गुन्ह्यांबाबतचा एक सविस्तर अहवालही शेलार यांनी विधानसभा अध्यक्षांना सादर केला.

यात पुढील मुद्दा म्हणजे, या कंपनीमध्ये दोन मोठया गुंतवणुकदारांचे पैसे असून त्यांची नावे पनामा पेपरमध्ये जाहीर झाली होती. यातील शौकत अली अब्दुल गफूर हा पाकिस्तानी एजंट आहे. तो लिबियामध्ये काम करतो. तो शस्त्र पुरवठादार आहे. दुसऱ्याचे नाव असद अली शौकत असून हा पाकिस्तानी आहे आणि तो दुबईमध्ये राहतो. हा सुध्दा हवाला रॅकेट चालवणारा असून यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीकडून महाराष्ट्र सरकार बेस्टसाठी ई बस घेण्यासाठी का गेले, त्यांनाच हे कंत्राट का देण्यात आले, असे सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केले.

निवडणुका आल्या की आराखड्यांचे मोती साबण बाहेर काढले जातात!

"मुंबईचा पुढच्या ५० वर्षांचा पर्यावरण कृती आराखडा तयार केला जात असून त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत सांगितले असले तरी माहुलमध्ये जिवघेणे पर्यावरण करणाऱ्या परदेशी कंपन्याला सरकार मदत करण्याची भूमिका घेत आहे. निवडणुका जवळ आल्या की आराखडयांचे मोती साबण बाहेर काढून मतदारांची दिशाभूल केली जाते", असे गंभीर आरोप आमदार शेलार यांनी यावेळी केले.

"माहुलमध्ये प्रदुषणाने उंचांक गाठलाय. मुंबई उच्च न्यायायालने माहुल हे गॅस चेंबर झाल्याचं निरिक्षण नोंदवलंय. येथील नागरिकांना तातडीने स्थलांतरित करा असे सांगतानाच प्रदुषण करणाऱ्या ४ कंपन्याना २८६ कोटीचा दंड आकारला. त्यानंतर राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी तीन बैठका घेऊन याबाबत चर्चा केल्याचे जाहीर केले. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत कॅव्‍हेट दाखल केली नाही. या कंपन्यांना मदत व्हावी म्हणूनच सरकारने बैठकांचा घाट घातला का असा संशय शेलारांनी व्यक्त केला.

"१ हजार कोटींचे बांबू जंगल गायब"

इंडियन स्टेट फॉरेस्टतर्फे जाहीर करण्यात आलेल्या अहवालामध्ये महाराष्ट्रात जंगल वाढले असे  जाहीर करण्यात आले असले तरी याच अहवालामध्ये महाराष्ट्रातून १ हजार ८८२ चौ. किमीचे जंगल गायब झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. एवढे मोठे जंगल कसे गायब झाले, त्याची किंमत १ हजार कोटी असून हे १ हजार कोटी कुठे गेले, असा सवालही शेलारांनी विचारला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAshish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे