शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

NCP मध्ये असंतोषाची मोठी यादी, २०२४ पर्यंत...; भाजपाचा शरद पवारांना सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 17:06 IST

आमदाराचा मुलगा आमदार, खासदाराचा मुलगा खासदार असं धोरण आहे. २०२४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारही भेटणार नाहीत असं त्यांनी सांगितले. 

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता गेल्यानंतर प्रचंड अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीतील कार्यकर्ता आणि नेत्यांचा स्वभाव सत्तेशिवाय राहण्याचा नाही. प्रचंड असंतोष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०२४ मध्ये बाहेर येईल. इतकी मोठी यादी आहे की आम्हाला त्या यादीवर काम करण्यासाठी विचार करावा लागतोय असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. सांगलीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे राष्ट्रवादीचं धोरण असल्याने जिल्ह्यातील एक माणूस मोठा होता आणि तोच सगळं कमावतो. नेता मोठा होतो पण स्थानिक कार्यकर्ता हा त्याच पातळीवर राहतो. सर्वसाधारण कार्यकर्त्यांना आमदार, खासदार होता येत नाही. आमदाराचा मुलगा आमदार, खासदाराचा मुलगा खासदार असं धोरण आहे. २०२४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारही भेटणार नाहीत असं त्यांनी सांगितले. 

ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये खदखद उद्धव ठाकरेंचा प्रश्न वेगळाच आहे. गजानन किर्तीकर यांनी विदर्भ, मराठवाड्यात शिवसेना वाढवली. त्यांच्यासारखे नेते उद्धव ठाकरेंना सोडतात. ज्यांनी संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या विचारांसाठी खर्ची घातलंय ते सोडून जातायेत. हे उद्धव ठाकरेंनी विचार करण्यासारखं आहे. केवळ काँग्रेसच्या संविधानाची कॉपी काढून स्वत:च्या पक्षाला लावावी इतकेच उरले आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. ज्यांच्याविरोधात लढाई आहे त्यांच्यासोबत जाऊन बसल्याने नाराजी आहे. शिवसेनेच्या मूळ कार्यकर्त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्याकडे गेल्याशिवाय पक्ष चालवणं कठीण झाले आहे असं बावनकुळे यांनी म्हटलं. 

४० आमदारांचे अस्तित्व धोक्यात आलेउद्धव ठाकरेंकडील अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युती ही विचारांची आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तेला लाथ मारून जो त्रास शिवसेनेच्या आमदारांना होत होता त्याचा वाचा फोडली. विचारांच्या लढाईत राष्ट्रवादीनं जिल्हाजिल्ह्यात ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. ४० आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला स्वीकारून ४० आमदारांनी वेगळा निर्णय घेतला असंही बावनकुळेंनी सांगितले. 

मंत्रालय लोकांच्या गर्दीनं भरलंएकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन भाजपानं महाराष्ट्राला नवा विचार दिला. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे दोन्हीही नेते १८ तास काम करतात. दोन्ही नेत्यांमध्ये कार्यकर्ता आहे. त्यामुळे मंत्रालयात १८ तास काम करणारे नेते भेटलेत. ज्यांना समाजाची जाण आहे. संपूर्ण राज्याचं व्हिजन आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिला नाही. मंत्रालयात आज कुणीही गेले तरी लोकांच्या गर्दीने मंत्रालय खचाखच भरलेले दिसेल असं कौतुक भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केले. 

भारत जोडो यात्रेचा घेतला समाचारज्या उद्देशाने राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली त्या यात्रेची फलश्रुती काही नाही. यात्रा काळात स्थानिक कार्यकर्ते नाराज होऊन भाजपात प्रवेश करतायेत. भारत जोडो यात्रेत पहिल्या दिवशीपासून आतापर्यंत बहुतांश कार्यकर्ते हे प्रवासी कार्यकर्ते आहेत. व्हिडिओ पाहिले तर राहुल गांधींपासून ४००-५०० कार्यकर्ते कॉमन आहेत असं सांगत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारत जोडो यात्रेचा समाचार घेतला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा