शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

Uddhav Thackeray: कुजकट टोमणे, भारंभार इशारे अन् पोकळ धमक्या; उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपाची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 10:15 IST

प्रत्यक्षात ज्या काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध केला. त्यांच्याबरोबर आपणच सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलोय, हे मात्र पक्षप्रमुख सोयीस्करपणे विसरले असंही भाजपानं सांगितले.

मुंबई – भाजपाचंहिंदुत्व नकली असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत केला. मुंबईतल्या सभेत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर विविध आरोप केले. त्याला आता भाजपाकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. तेच तेच पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी एवढी मोठी सभा घेण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा ई सभा घेतली असती तर सर्वांचे कष्ट तरी वाचले असते. बाकी चहुबाजूंनी त्रस्त झालेल्या पक्षप्रमुख कम मुख्यमंत्र्यांनी आपला त्रागा सभेतून व्यक्त केला असा टोला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला लगावला.

केशव उपाध्ये(BJP Keshav Upadhye) यांनी पोस्ट करत म्हटलं की,  कुजकट टोमणे, भारंभार इशारे आणि पोकळ धमक्या यांच्यापलीकडे पक्षप्रमुखांचे भाषण गेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागून स्वतःच्या हिंदुत्वाचं सत्व गमावल्यानंतर भाजपाच्या हिंदुत्वाला बोल लावण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुखांनी केला. पण भाजपाचं हिंदुत्व किती प्रखर आणि प्रभावी आहे. याची माहिती सर्वसामान्य जनतेला आहे. बाकी महापालिका निवडणुका जवळ आल्याने मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असे घासून गुळगुळीत झालेले मुद्दे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावरून संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरून भाजपावर निराधार आरोप केले. पण प्रत्यक्षात ज्या काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध केला. त्यांच्याबरोबर आपणच सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलोय, हे मात्र पक्षप्रमुख सोयीस्करपणे विसरले असंही त्यांनी सांगितले.

त्याचसोबत औरंगाबादच्या नामांतराबाबत हात वर करत मुख्यमंत्र्यांनी आपली हतबलता व्यक्त केलीय. एकंदरीत मोठा गाजावाजा करून अखेर सुपरडुपर फ्लॉप झालेल्या सिनेमासारखं हे भाषण झालं. त्यात ना हिंदुत्वाचा हुंकार होता. ना महाराष्ट्राच्या विकासाची दिशा होती. ना स्वतःच्या शिवसैनिकांना काही संदेश होता. होती ती केवळ वैफल्यग्रस्तता, अगतिकता आणि त्रागा असंही भाजपाने म्हटलं आहे.

 “भाजपचे हिंदुत्व विकृत, विखारी अन् गळेकापू”; भव्य सभेत उद्धव ठाकरेंचा कडाडून हल्लाबोल

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

भाजपचा हिंदुत्वाचा बुरखा पुरता फाटल्याने त्यांचा भेसूर चेहरा समोर आला असून, विकृत, विखारी अन् गळेकापू राजकारण भाजप करीत असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीमधील प्रचंड जाहीर सभेत केला. देवेंद्र फडणवीसांना मुंबई स्वतंत्र करायची आहे, तीच त्यांच्या मालकांची इच्छा आहे; पण तुमच्या मालकासकट कोणीही आले तरी हौतात्म्य पत्करून मिळविलेल्या मुंबईचे लचके तोडणाऱ्यांचेच तुकडे होतील, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

या सभेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांनी भाषणात भाजप, केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टीकेचे लक्ष्य केले. खोट्या हिंदुत्वाचा बुरखा घातलेला भाजप देशाला भरकटवण्याचे काम करीत आहे. काश्मिरी पंडितांच्या होत असलेल्या हत्या रोखण्यात येत असलेले अपयश, वाढती महागाई यावरून भाजपावर हल्ले चढविले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाHindutvaहिंदुत्व