शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

घनसावंगीत युतीचं ठरण्यापूर्वीच भाजपमध्ये गटबाजी ! शिवसेनाही मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:24 PM

2014 मध्ये शिवसेना आणि भाजपमधील मतविभाजनामुळे राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांचा विजय सुकर झाला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यास हे पुन्हा एकदा टोपे यांच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. परंतु, युतीची चर्चा अद्याप अंतिम झाली नाही. त्यामुळे अनेक मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. अनेकांना विधानसभेची तयारी सुरू केली आहे. ही स्थिती शिवसेना आणि भाजप यांच्यात आहे. परंतु, भाजपमधून निवडणूक लढविल्यास हमखास विजय असं समीकरण झाल्यामुळे भाजपमधून उमेदवारीसाठी भाऊगर्दी वाढली आहे. मात्र युतीचं फायनल होण्यापूर्वीच  भाजपमध्ये गटबाजीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.  

2014 विधानसभा निवडणुकीत राज्यातील प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. त्यावेळी घनसावंगी मतदार संघातून राजेश टोपे यांच्याविरुद्ध लढताना भाजप दुसऱ्या स्थानी होते. तर शिवसेना तिसऱ्या स्थानी फेकल्या गेली होती. त्यामुळे हा मतदार संघ भाजपला मिळावा अशी मागणी होत आहे. वास्तविक पाहता घनसावंगी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढान यांनी तयारी सुरू केली आहे.

2014 मध्ये शिवसेना आणि भाजपमधील मतविभाजनामुळे राष्ट्रवादीचे  राजेश टोपे यांचा विजय सुकर झाला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यास हे पुन्हा एकदा टोपे यांच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे.

युतीवर बरच काही निर्भर2014 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षाला जागा सोडण्याचा निकष ठरविण्यात आल्याचे समजते. त्यानुसार घनसावंगी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भाजप-सेनेचे एकगठ्ठा मतं युतीच्या उमेदवाराला मिळतील. त्यातच वंचितच्या उमेदवारावर बरच काही अवलंबून असणार आहे. अशा स्थितीत फायदा पुन्हा युतीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीवर बरच काही अवलंबून असणार आहे.

उमेदवारीसाठी बापू-बापू आमने सामने

भाजपकडून 2014 मध्ये ऐनवेळी विलासबापू खरात यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून दाखल झालेले भाजयुमोचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बापू आर्दड यांनीही घनसावंगीतून उमेदवारी मिळविण्यासाठी मजबूत फिल्डींग लावली आहे. एकूणच विलासबापू आणि सुनीलबापू यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे. एकाचवेळी दोन्ही नेते बैठकांचे आयोजन करत आहे. त्यामुळे कोणाच्या बैठकीला जावं, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडत आहे. मात्र ही गटबाजी कायम राहणार की, उमेदवार निश्चित झाल्यानंतर बंद होईल, हे तर येणारा काळच सांगणार आहे. त्याआधी सर्वांच्या नजरा युती होणार का याकडे लागल्या आहेत.