शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भाजपने धनंजय मुंडेंऐवजी अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करावे : रोहित पवार यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 18:05 IST

देशाच्या सुरक्षेबाबतची गोपनीय माहिती एखाद्या पत्रकाराला कशी काय मिळते?

बारामती : देशाच्या सुरक्षेबाबतची गोपनीय माहिती एखाद्या पत्रकाराला कशी काय मिळते? हे अतिशय गंभीर आहे. भाजपने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आंदोलन करण्यापेक्षा पत्रकार अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करणे गरजे आहे, असा टोला आमदार रोहित पवार यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना लगावला.

बारामती येथे आयोजित कृषि तंत्रज्ञान सप्ताहानंतर रोहित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपाबाबत भाजपच्या वतीने आंदोलने केले जात आहेत. मुंडेंवर आरोप झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी जाहीरपणे व्यक्त झाले आहेत. एखादा माणूस ज्यावेळेस व्यक्त होतो तेव्हा त्याच्या मनामध्ये खोट नसते. पोलीस प्रशासन त्याबाबत योग्य लक्ष ठेवून आहे. एडीआर रिपोर्ट प्रत्येक आमदार खासदारांसाठी काढला जातो. आज देशभरात आपण बघितलं तर सर्वात जास्त भाजपाच्या आमदार-खासदार यांच्याविरोधात महिला अत्याचाराचे आरोप आहेत. धनंजय मुंडे यांच्याबाबत भाजप करत असलेले हे आंदोलन राजकीय हेतूने होत आहे. भाजपाने खरेतर अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे. व राज्य भाजपाने केंद्राला लिखित पत्राद्वारे गोस्वामी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली पाहिजे. गोस्वामीना गोपनीय माहिती तीन दिवस अगोदरच कशी समजते. देशाने बागलकोटवर केलेल्या हल्ल्याची गोस्वामीला तीन दिवस अगोदरच माहिती होती. एवढी मोठी गोपनीय माहिती भाजपाची बाजू घेणाऱ्या पत्रकाराला मिळणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंडे ऐवजी भाजपाने गोस्वामी विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे असे पवार म्हणाले.

ज्या लोकांनी दहा २० वर्ष गावचा विकास केला नाही. गावकऱ्यांचा आवाज दाबला जायचा. अशा गावात राष्ट्रवादीने सत्ता आणली आहे. मात्र कर्जत-जामखेड भागात जेथे-जेथे राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकली नाही. त्या भागातील ग्रामपंचायतींच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी प्रामाणिकपणे आणला जाईल. कारण शेवटी ते माझे लोक आहेत, अशी भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BaramatiबारामतीRohit Pawarरोहित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाarnab goswamiअर्णब गोस्वामी