शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

भाजपाचा महायुतीचा फॉर्म्युला पक्का, पक्षश्रेष्ठींनीही मारला शिक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 9:58 PM

नवीन फॉर्म्युल्यानुसार भाजप 144, शिवसेना 126 आणि इतर १८ जागांवर लढणार

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : राज्य विधानसभेच्या २८८ पैकी १४४ जागा आपण लढवाव्यात आणि शिवसेनेला १२६ जागा सोडाव्यात, असे भाजपने ठरविले असून, उरलेल्या १८ मतदारसंघ मित्रपक्षांसाठी सोडण्यावरही भाजपमध्ये एकमत झाले आहे. भाजपने १४४ पैकी १00 उमेदवारांची नावेही निश्चित केली असून, ती २९ सप्टेंबर रोजी वा त्यानंतर घोषित केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी तयारी दर्शवली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, प्रदेश भाजपचे संघटन सचिव विजय पुराणिक यांनी गुरुवारी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी, भूपेंद्र यादव, सरोज पांडे आदी केंद्रीय नेत्यांशी शिवसेनेला सोडावयाच्या जागा व संभाव्य उमेदवारांची नावे यावर प्रदीर्घ चर्चा केली. या बैठकीत शिवसेनेसाठी १२६ जागा सोडण्याचे भाजपने नक्की केल्याचे सांगण्यात आले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती या मित्रपक्षांना मिळून १८ जागा सोडण्यावरही यावेळी एकमत झाले.

मात्र हे चारही पक्ष भाजपचे मित्रपक्ष म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भाजप व मित्रपक्षांना मिळून अधिक जागा मिळणार, हे यातून स्पष्ट झाले आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने किमान १0 जागा मिळाव्यात, असा आग्रह धरला असला तरी त्या पक्षाला तीन ते पाच जागाच मिळू शकतील, तर राष्ट्रीय समाज पक्षाला एक वा दोन जागा सोडल्या जातील, असे कळते. शिवसंग्राम व सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीला प्रत्येकी एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यातही शिवसंग्राम व रयत क्रांती कदाचित भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. म्हणजेच मित्रपक्षांना १0 पेक्षा अधिक जागा मिळणे अवघड आहे, असे समजते. परिणामी शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपचाच अधिक फायदा होण्याची चिन्हे आहेत.

या फॉर्म्युल्यास शिवसेनेची तयारी नसल्यास भाजपने सर्व २८८ जागा लढवाव्यात, असेही मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. पण मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना १२६ जागांवर तयार होईल, असे भाजपच्या राज्यातील नेत्यांना वाटत असून, त्यामुळे युती होण्यात अडचणी नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात आपण १२६ पेक्षा अधिक जागा शिवसेनेसाठी सोडू नयेत, असे केंद्रीय नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता, फडणवीस सरकारने केलेली कामे आणि अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची झालेली अडचण यांमुळे आपण स्वबळावरही बहुमत मिळवू शकतो, अशी भाजप नेत्यांची खात्री आहे. तरीही सन्मानपूर्वक तोडगा म्हणून शिवसेनेसाठी १२६ जागा सोडण्यावर भाजप नेतृत्वाचे एकमत झाले, असे सांगण्यात आले.गेल्या विधानसभेत काय झाले होते?गेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपने २६0 जागा लढवून १२२ जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेने २८२ जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्यापैकी ६३ जागांवर विजय मिळविला होता. भाजपला बहुमतासाठी केवळ २३ जागा कमी पडल्याने शिवसेनेशी नंतर युती झाली होती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019