शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

'मातोश्री'त ठाकरे-शाहांच्या बंद दाराआड बैठकीत नेमकं काय घडलं?; भाजपाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 11:38 IST

२०१९ च्या निकालानंतर लोकांनी युतीला कौल दिला परंतु मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी शिवसेनेने दगाफटका केला असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.

मुंबई - राज्यात घडलेल्या राजकीय सत्तानाट्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ४० आमदार आणि १९ खासदारांपैकी १२ खासदार यांनी वेगळी भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला. त्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी युती करायला सांगितल्याचा गौप्यस्फोट केला. 

आता पुन्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात झालेल्या बंद दाराआड चर्चेचा मुद्दा समोर आला आहे. भाजपानं मुख्यमंत्रिपदाचा शब्द पाळला नाही असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेत्यांकडून वारंवार करण्यात येतो. त्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खुलासा केला आहे. दानवे म्हणाले की, त्यावेळी मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो मला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा फोन आला. आपल्याला शिवसेनेसोबत युतीची चर्चा करायची आहे असं त्यांनी सांगितले. त्यानंतर चर्चेसाठी आम्ही एक टीम तयार केली. या टीममध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजपा नेत्यांचा समावेश होता. अमित शाह मुंबईत आले तेव्हा शिवसेनेशी काय बोलायचे यावर चर्चा झाली. सर्वकाही ठरवून आम्ही मातोश्रीवर गेलो, तिथे शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. काहीवेळ आमच्यात चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना अपून दोनो जरा अंदर बैठेंगे असं सांगत त्यांना आतल्या खोलीत घेऊन गेले. आम्ही तेव्हा बाहेर बसून होतो असं दानवेंनी सांगितले. 

काही वेळाने दोघंही बाहेर आले. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊ असं सांगितले. परंतु मुख्यमंत्रिपदाचा विषयच काढला नाही. त्यानंतर ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरेंनी आतल्या खोलीत काय चर्चा झाली हे सांगितले नाही. पण सह्याद्रीवर गेल्यावर अमित शाह यांनी आतल्या खोलीत काय झाले हे सगळं सांगितले. उद्धव ठाकरेंनी जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा विषय काढला होता. परंतु मी त्यांना सांगितले, शिवसेना-भाजपा युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंनी युती केली. तेव्हाच युतीचा फॉर्म्युला ठरला होता. ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री हे तेव्हाच ठरले होते. या फॉर्म्युल्यात काहीही मोडतोड करायची नाही असं शाह यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं. 

मात्र २०१९ च्या निकालानंतर लोकांनी युतीला कौल दिला परंतु मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी शिवसेनेने दगाफटका केला. ही गोष्ट आमदार-खासदारांनाही आवडली नाही. परंतु केव्हातरी याचा स्फोट होणारच होता. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार-खासदारांनी बंड नव्हे तर उठाव केला आहे. शिंदे गटाकडे जास्त आमदार, खासदार आहेत. त्यांचे अधिक प्रबळ आहे असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितले. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAmit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा