शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

'मातोश्री'त ठाकरे-शाहांच्या बंद दाराआड बैठकीत नेमकं काय घडलं?; भाजपाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 11:38 IST

२०१९ च्या निकालानंतर लोकांनी युतीला कौल दिला परंतु मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी शिवसेनेने दगाफटका केला असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.

मुंबई - राज्यात घडलेल्या राजकीय सत्तानाट्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ४० आमदार आणि १९ खासदारांपैकी १२ खासदार यांनी वेगळी भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला. त्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी युती करायला सांगितल्याचा गौप्यस्फोट केला. 

आता पुन्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात झालेल्या बंद दाराआड चर्चेचा मुद्दा समोर आला आहे. भाजपानं मुख्यमंत्रिपदाचा शब्द पाळला नाही असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेत्यांकडून वारंवार करण्यात येतो. त्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खुलासा केला आहे. दानवे म्हणाले की, त्यावेळी मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो मला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा फोन आला. आपल्याला शिवसेनेसोबत युतीची चर्चा करायची आहे असं त्यांनी सांगितले. त्यानंतर चर्चेसाठी आम्ही एक टीम तयार केली. या टीममध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजपा नेत्यांचा समावेश होता. अमित शाह मुंबईत आले तेव्हा शिवसेनेशी काय बोलायचे यावर चर्चा झाली. सर्वकाही ठरवून आम्ही मातोश्रीवर गेलो, तिथे शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. काहीवेळ आमच्यात चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना अपून दोनो जरा अंदर बैठेंगे असं सांगत त्यांना आतल्या खोलीत घेऊन गेले. आम्ही तेव्हा बाहेर बसून होतो असं दानवेंनी सांगितले. 

काही वेळाने दोघंही बाहेर आले. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊ असं सांगितले. परंतु मुख्यमंत्रिपदाचा विषयच काढला नाही. त्यानंतर ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरेंनी आतल्या खोलीत काय चर्चा झाली हे सांगितले नाही. पण सह्याद्रीवर गेल्यावर अमित शाह यांनी आतल्या खोलीत काय झाले हे सगळं सांगितले. उद्धव ठाकरेंनी जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा विषय काढला होता. परंतु मी त्यांना सांगितले, शिवसेना-भाजपा युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंनी युती केली. तेव्हाच युतीचा फॉर्म्युला ठरला होता. ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री हे तेव्हाच ठरले होते. या फॉर्म्युल्यात काहीही मोडतोड करायची नाही असं शाह यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं. 

मात्र २०१९ च्या निकालानंतर लोकांनी युतीला कौल दिला परंतु मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी शिवसेनेने दगाफटका केला. ही गोष्ट आमदार-खासदारांनाही आवडली नाही. परंतु केव्हातरी याचा स्फोट होणारच होता. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार-खासदारांनी बंड नव्हे तर उठाव केला आहे. शिंदे गटाकडे जास्त आमदार, खासदार आहेत. त्यांचे अधिक प्रबळ आहे असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितले. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAmit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा