शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही; भाजपचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 12:37 IST

Pandharpur ByPoll: पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही, असा एल्गार भाजपकडून करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपंढरपूर पोटनिवडणुकीचे प्रचाररण तापलेराष्ट्रवादी आणि भाजपमध्ये थेट टक्कर होण्याची चिन्हेआरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू

पंढरपूर: देशभरातील पाच राज्यांमधील निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राज्यातही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची (Pandharpur ByPoll) धामधूम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना, प्रचाराचे रणही तापताना दिसत आहे. पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही, असा एल्गार भाजपकडून करण्यात आला आहे. (Ranjeet Singh Naik Nimbalkar on Pandharpur ByPoll)

आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि भाजपकडून समाधान आवताडे (Samadhan Autade) यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून जशी माढा लोकसभा मतदारसंघाची जागा काढून घेतली, तशी पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही, असे शड्डू भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeet Singh Naik Nimbalkar) यांनी ठोकला आहे. 

पोटनिवडणूक भाजपला बिनविरोध करायची होती

पंढरपूर पोटनिवडणूक भाजपला बिनविरोध करायची होती. त्याबद्दल प्रशांत परिचारक यांनाही कळवण्यात आले होते. राष्ट्रवादीने भारत भालके यांच्या पत्नीला संधी दिली असती, तर भाजपची बिनविरोध निवडणूक करण्याची तयारी होती. परंतु, राष्ट्रवादीला ही भावना कळली नाही, असा आरोप निंबाळकर यांनी केला.

“अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर अजून सुरुवात; आगे आगे देखो होता है क्या”

नातवाच्या हट्टापायी आजोबांची निवडणुकीतून माघार

मागील लोकसभा निवडणुकीत शरद पवार पुन्हा माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीही लोकसभा निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त केली. कुटुंबातील अनेक व्यक्तींना तिकीट दिले तर चुकीचा संदेश जाईल आणि कार्यकर्ते नाराज होतील, असे मत शरद पवार यांनी त्यावेळी व्यक्त केले. नातवाच्या हट्टापायी पवार आजोबांनी निवडणुकीतून माघार घेतली. परंतु पार्थ यांच्या पदरी यश पडले नाही, असेही निंबाळकर म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे; त्यांच्या शब्दावर माझा विश्वास”: जयंत पाटील 

विरोधकांवर टीकास्त्र

विरोधक पोटनिवडणुकीत मृत्यूचे भांडवल करुन अनुकंपाच्या नावाखाली जागा भरण्यासाठी मतं मागायला येतात, हे साफ चुकीचे आहे. आपल्याला लोकांना न्याय देता आला पाहिजे. लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडता आले पाहिजेत. अनुकंपाखाली जागा भरायला हे काय एसटी महामंडळ नाही, अशी टीका करत मतदारसंघासाठी केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देत आहोत. पांडुरंग हा गरिबांचा देव आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विठ्ठलभक्त आहेत, असा दावा निंबाळकर यांनी यावेळी केला. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरElectionनिवडणूकSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण