शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

"तुम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून..."; सणांवरुन भाजपा नेत्याचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 13:29 IST

BJP Ram Kadam on Aaditya Thackeray : भाजपाचे नेते राम कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे यांनी माईक आणि लाऊडस्पीकर लावण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. "या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधन घालायची, ही कसली निती?" असा सवाल करत महायुती सरकारला घेरलं. आदित्य ठाकरे यांच्या टीकेला आता भाजपा नेत्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

भाजपाचे नेते राम कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "हिंदुत्व सोडलं म्हणून ज्या उबाठाला विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार चपराक मिळाली. त्या उबाठाला आता हिंदू सण आठवले" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. तसेच "आमच्या सरकारमध्ये कोणत्याही सणाला किंवा उत्सवाला बंदी नाही. कोणी तसे खटाटोप करत असेल तर त्यांना हे सरकार माफ करणार नाही" असंही म्हटलं आहे.  

"उबाठाला आता हिंदू सण आठवले"

"हिंदुत्व सोडलं म्हणून ज्या उबाठाला विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार चपराक मिळाली. त्या उबाठाला आता हिंदू सण आठवले. सत्तेच्या काळात वसुलीबाज आणि कोरोनाकाळात खिचडीचोर अशी प्रतिमा तुमची. वाईन शॉप आणि बियर बार आधी उघडलेत. आम्ही रस्त्यावर आंदोलन केली तरी देखील मंदिरांना टाळं लावणारे तुम्ही आणि आता आम्हाला सांगता... हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे." 

"कोणत्याही सणाला, उत्सवाला बंदी नाही"

"आमच्या सरकारमध्ये कोणत्याही सणाला किंवा उत्सवाला बंदी नाही. कोणी तसे खटाटोप करत असेल तर त्यांना देखील हे सरकार माफ करणार नाही. पण तुमचे उरलेसुरलेले आमदार आणि खासदार, तुम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून तुम्हाला सोडून जातील आणि खऱ्या शिवसेनेकडे वळतील, म्हणून अशा प्रकारचे उपद्व्याप युवराज करत आहेत" असं राम कदम यांनी म्हटलं आहे. 

"महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?"

आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलं होतं. "महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या गणेश मंडळांना विविध नियमांमध्ये अडकवून आणि विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवून छळलं जातंय... आणि आता कोळीबांधवांसाठीच नाही तर सर्व हिंदू धर्मीयांसाठी महत्वाच्या असलेल्या होळी सणाच्या वेळी 'माईक आणि लाऊडस्पिकरचे नियम' दाखवून माझ्या वरळी मतदारसंघातल्या कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरु आहे... या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? 'चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधन घालायची', ही कसली निती?" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Ram Kadamराम कदमBJPभाजपाAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाHindutvaहिंदुत्वHoliहोळी 2025