शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Maharashtra Political Crisis: “वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 09:35 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील अन्य नेत्यांवर ईडी कारवाया झाल्या, तेव्हा उद्धव ठाकरेंनी साधा फोनही केला नाही. संजय राऊतांचाच एवढा कळवळा का, अशी विचारणा भाजपने केली आहे.

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. तर, शिवसेनेतील गळती थांबता थांबत नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाचवण्याचा मोठा पेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर असणार आहे. यातच आता ठाकरे पिता-पुत्र चांगलेच सक्रीय झाले असून, राज्यभरात दौरे काढले जात आहेत. यावरून भाजपने टीका केली आहे. 

भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे. वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही. ज्यावेळेस आदित्य ठाकरे मंत्री होते व त्यांचे वडील मुख्यमंत्री होते त्यावेळेस जर आपण कोविड सारख्या भीषण संकटात सामान्य जनतेची, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची सुख-दु:ख व शिवसैनिकांच्या व्यथा समजून घेतल्या असत्या तर काही उपयोग झाला असता. परंतु आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

आनंदराव अडसूळ यांची भेट घ्यावी असे उद्धव ठाकरेंना वाटले नाही

संजय राऊत यांनी शिवसेना सोडावी असे भाजपमधल्या कुठल्याही कार्यकर्त्याला, नेत्याला वाटत नाही. उलट त्यांच शिवसेनेत राहणचं योग्य आहे. ज्यावेळी राऊतांप्रमाणेच आनंदराव अडसूळ साहेबांवर ईडीची कारवाई झाली, तेव्हा एक ज्येष्ठ नेता विवंचनेत होता. त्यावेळेस त्यांची भेट घ्यावी असे उद्धव ठाकरेंना वाटले नाही. यशवंत जाधव स्थायी समितीचे ३-४ वर्ष अध्यक्ष झाल्यानंतर ज्यांनी मातोश्रीचेच हित जपले त्यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यावर साधा एक फोनही आपण करु शकला नाहीत, अशी खंत व व्यथा त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी व्यक्त केली होती. मग आता एकदम संजय राऊतांचाच कळवळा का याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवे, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळpravin darekarप्रवीण दरेकरAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे