शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Maharashtra Political Crisis: “वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 09:35 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील अन्य नेत्यांवर ईडी कारवाया झाल्या, तेव्हा उद्धव ठाकरेंनी साधा फोनही केला नाही. संजय राऊतांचाच एवढा कळवळा का, अशी विचारणा भाजपने केली आहे.

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. तर, शिवसेनेतील गळती थांबता थांबत नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाचवण्याचा मोठा पेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर असणार आहे. यातच आता ठाकरे पिता-पुत्र चांगलेच सक्रीय झाले असून, राज्यभरात दौरे काढले जात आहेत. यावरून भाजपने टीका केली आहे. 

भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे. वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही. ज्यावेळेस आदित्य ठाकरे मंत्री होते व त्यांचे वडील मुख्यमंत्री होते त्यावेळेस जर आपण कोविड सारख्या भीषण संकटात सामान्य जनतेची, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची सुख-दु:ख व शिवसैनिकांच्या व्यथा समजून घेतल्या असत्या तर काही उपयोग झाला असता. परंतु आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

आनंदराव अडसूळ यांची भेट घ्यावी असे उद्धव ठाकरेंना वाटले नाही

संजय राऊत यांनी शिवसेना सोडावी असे भाजपमधल्या कुठल्याही कार्यकर्त्याला, नेत्याला वाटत नाही. उलट त्यांच शिवसेनेत राहणचं योग्य आहे. ज्यावेळी राऊतांप्रमाणेच आनंदराव अडसूळ साहेबांवर ईडीची कारवाई झाली, तेव्हा एक ज्येष्ठ नेता विवंचनेत होता. त्यावेळेस त्यांची भेट घ्यावी असे उद्धव ठाकरेंना वाटले नाही. यशवंत जाधव स्थायी समितीचे ३-४ वर्ष अध्यक्ष झाल्यानंतर ज्यांनी मातोश्रीचेच हित जपले त्यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यावर साधा एक फोनही आपण करु शकला नाहीत, अशी खंत व व्यथा त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी व्यक्त केली होती. मग आता एकदम संजय राऊतांचाच कळवळा का याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवे, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळpravin darekarप्रवीण दरेकरAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे