शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

“हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस पक्ष बुडवण्यासाठी नेमणूक झालेली आहे”; नारायण राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:02 IST

BJP Narayan Rane News: हर्षवर्धन सपकाळ यांना राज्यातील प्रश्न माहिती नाहीत. कोणत्या विषयासाठी अध्यक्षपदाचा उपयोग करायचा, ते माहिती नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

BJP Narayan Rane News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केले. औरंगजेब क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस तेवढेच क्रूर आहेत, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानावरून महायुतीतील नेते काँग्रेसवर सडकून टीका करत आहेत. भाजपा खासदार नारायण राणे यांनीही यावरून टीकास्त्र सोडले.

मीडियाशी बोलताना नारायण राणे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. हर्षवर्धन सपकाळ मूर्ख माणूस आहे. औरंगजेब कोण होता? महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काय लोक म्हणतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. औरंगजेबाची उपमा आताच्या सरकारमध्ये आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर बोलणे योग्य नाही. हर्षवर्धन सपकाळ यांना राज्यातील प्रश्न माहिती नाहीत. कोणत्या विषयासाठी अध्यक्षपदाचा उपयोग करायचा आहे, त्या माणसाला माहिती नाही. हा पक्ष वाढवण्यासाठी नेमणूक झाली नाही, तर पक्ष बुडवण्यासाठी या माणसाची नेमणूक झालेली आहे, या शब्दांत नारायण राणे यांनी सुनावले.

समुद्रत तेल साठे सापडले असतील तर चांगली गोष्ट

समुद्रत तेल साठे सापडले असतील तर चांगली गोष्ट आहे. त्याचा सर्व्हे होऊ देत, किती खाली तेलसाठा आहे समजू दे. मालवणसाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, हर्षवर्धन सपकाळ यांची आताच नवीन नियुक्ती झाले आहेत. सरकारवर टीका करतो, हे दिल्लीला दाखवायला पाहिजे त्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. काँग्रेसने आत्मचिंतन केले पाहिजे. काँग्रेसने आपला पराभव असा का झाला? हे पाहिले पाहिजे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये आमदार सोडा, स्वतःच्या ग्रामपंचायतीचे सदस्य किती आहेत हे पहिले भिंग घेऊन शोधले पाहिजे. मग त्यांनी आम्हाला सल्ला दिला पाहिजे, असा पलटवार उदय सामंत यांनी केला.

दरम्यान, आम्ही जो काही कारभार केला, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केला आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, असा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. तोच आदर्श छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा होता, कोणाची तुलना करत आहात तुम्ही जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे, असा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसBJPभाजपा