शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:59 IST

BJP MP Ashok Chavan News: प्रेरणा देण्यासारखे कोणतेही काम दिसत नाही. काँग्रेस नेतृत्वहीन झालेला पक्ष आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

BJP MP Ashok Chavan News: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाला पडत असलेले खिंडार दिवसेंदिवस मोठे होताना पाहायला मिळत आहे. ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये पक्ष प्रवेश होताना पाहायला मिळत आहेत. नाशिकमधील उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. यातच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत भाजपा खासदार अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 

सांगलीच्या राजकारणात दिवंगत मदन पाटील यांचा स्वतंत्र गट कार्यरत आहे. काँग्रेसअंतर्गत आतापर्यंत हा गट सक्रिय होता. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिवंगत माजी मंत्री मदन पाटील गटाच्या नेत्या, जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती. यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी मदन पाटील यांचा गट भाजपबरोबर यावा, यासाठी प्रदेश पातळीवरील भाजपाच्या नेत्यांनी जयश्रीताई पाटील यांना संपर्क केला होता. त्यांच्याशी चर्चेनंतर जयश्रीताई यांचा भाजपामध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. या घडामोडींबाबत पत्रकारांनी अशोक चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारली असता, काँग्रेसवर टीका केली. 

काँग्रेस नेतृत्वहीन झालेला पक्ष आहे

पत्रकारांशी बोलताना भाजपा खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेसची अवस्था अशी आहे की, हा केवळ नात्यागोत्यांचा पक्ष राहिलेला आहे. विशेषतः महाराष्ट्रात हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. प्रेरणा देण्यासारखे कोणतेही काम दिसत नाही. टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम असले, तरी नुसते टीका-टिप्पणीवर राज्य चालत नसते. कष्टही करावे लागतात. राज्याच्या प्रगतीचा पुढचा रोडमॅप तयार करावा लागतो. टीम सोबत घेऊन उत्साहाने काम करण्यासाठी त्यांना प्रेरणा द्यावी लागते. दुर्दैवाने कोणतीच बाब महाराष्ट्रात होताना दिसत नाही. स्वाभाविक आहे की, लोक किती दिवस वाट पाहतील. सांगलीत ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्याचे प्रमुख कारण असे आहे की, काँग्रेस नेतृत्वहीन झालेला पक्ष आहे. त्यामुळे अशा गोष्टी घडणारच, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करणे चुकीचे आहे. भाजपाबरोबर जाणे म्हणजे अनैसर्गिक युती ठरणार असल्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी केले. दिवंगत नेते मदन पाटील यांनीही १९९९ मध्ये राष्ट्रवादी आणि दिवंगत नेते संभाजी पवार यांच्याशी युती केली होती; पण, सांगलीकरांनी या युतीला झिडकारले होते. या निवडणुकीत मदनभाऊ यांचा पराभव झाला होता. म्हणून जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करू नये. सांगलीकरांना हा निर्णय रुचणार नाही. म्हणून जयश्रीताई यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय रद्द करण्याची गरज आहे, असेही विशाल पाटील यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस