शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:59 IST

BJP MP Ashok Chavan News: प्रेरणा देण्यासारखे कोणतेही काम दिसत नाही. काँग्रेस नेतृत्वहीन झालेला पक्ष आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

BJP MP Ashok Chavan News: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाला पडत असलेले खिंडार दिवसेंदिवस मोठे होताना पाहायला मिळत आहे. ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये पक्ष प्रवेश होताना पाहायला मिळत आहेत. नाशिकमधील उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. यातच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत भाजपा खासदार अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 

सांगलीच्या राजकारणात दिवंगत मदन पाटील यांचा स्वतंत्र गट कार्यरत आहे. काँग्रेसअंतर्गत आतापर्यंत हा गट सक्रिय होता. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिवंगत माजी मंत्री मदन पाटील गटाच्या नेत्या, जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती. यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी मदन पाटील यांचा गट भाजपबरोबर यावा, यासाठी प्रदेश पातळीवरील भाजपाच्या नेत्यांनी जयश्रीताई पाटील यांना संपर्क केला होता. त्यांच्याशी चर्चेनंतर जयश्रीताई यांचा भाजपामध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. या घडामोडींबाबत पत्रकारांनी अशोक चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारली असता, काँग्रेसवर टीका केली. 

काँग्रेस नेतृत्वहीन झालेला पक्ष आहे

पत्रकारांशी बोलताना भाजपा खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेसची अवस्था अशी आहे की, हा केवळ नात्यागोत्यांचा पक्ष राहिलेला आहे. विशेषतः महाराष्ट्रात हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. प्रेरणा देण्यासारखे कोणतेही काम दिसत नाही. टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम असले, तरी नुसते टीका-टिप्पणीवर राज्य चालत नसते. कष्टही करावे लागतात. राज्याच्या प्रगतीचा पुढचा रोडमॅप तयार करावा लागतो. टीम सोबत घेऊन उत्साहाने काम करण्यासाठी त्यांना प्रेरणा द्यावी लागते. दुर्दैवाने कोणतीच बाब महाराष्ट्रात होताना दिसत नाही. स्वाभाविक आहे की, लोक किती दिवस वाट पाहतील. सांगलीत ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्याचे प्रमुख कारण असे आहे की, काँग्रेस नेतृत्वहीन झालेला पक्ष आहे. त्यामुळे अशा गोष्टी घडणारच, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करणे चुकीचे आहे. भाजपाबरोबर जाणे म्हणजे अनैसर्गिक युती ठरणार असल्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी केले. दिवंगत नेते मदन पाटील यांनीही १९९९ मध्ये राष्ट्रवादी आणि दिवंगत नेते संभाजी पवार यांच्याशी युती केली होती; पण, सांगलीकरांनी या युतीला झिडकारले होते. या निवडणुकीत मदनभाऊ यांचा पराभव झाला होता. म्हणून जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करू नये. सांगलीकरांना हा निर्णय रुचणार नाही. म्हणून जयश्रीताई यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय रद्द करण्याची गरज आहे, असेही विशाल पाटील यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस