शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपच्या आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत मुंबई न सोडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 13:16 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : जोरदार खलबते सुरू : सत्तास्थापनेसाठी मुंबईत जोरदार घडामोडी..

ठळक मुद्दे१०५ आमदारांना ‘५ नोव्हेंबरपर्यंत कोणीही मुंबई सोडून बाहेर जाऊ नका,’ असे स्पष्ट आदेश

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने भाजप-सेना युतीमध्ये आणि राष्ट्रवादी काँगे्रस -काँगे्रस आघाडीमध्ये सत्तास्थापनेसाठी जोरदार खलबते सुरू आहेत. मुंबईमध्ये सर्वच पक्षांमध्ये क्षणाक्षणाला घडामोडी घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व १०५ आमदारांना ‘५ नोव्हेंबरपर्यंत कोणीही मुंबई सोडून बाहेर जाऊ नका,’ असे स्पष्ट आदेश दिले आहेत. यामुळे दिवाळीनंतर भाजपचे सर्व आमदार मुंबईमध्येच तळ ठोकून आहेत.राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा, तर मित्रपक्ष शिवसेनेला केवळ ५४ जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपला स्पष्ट बहुतम मिळण्याची अपेक्षा होती; परंतु निवडणूक निकालानंतर सेना-भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी मुख्यमंत्रिपद कुणाला, यासाठी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राज्यात सुमारे २४ अपक्ष आमदार निवडून आले असून, त्यांपैकी जास्तीत जास्त आमदारांचा पांठिबा मिळविण्यासाठी भाजप, शिवसेना यांचा प्रयत्न सुरू आहे. तर, राष्ट्रवादी काँगे्रसने शिवसेनेचादेखील मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी गुगली टाकून राजकारण आणखीच पेटवून दिले आहे. काँग्रेसचे सर्व नेते दिल्लीत पक्षनेत्यांची भेट घेऊन पुढील वाटचाल ठरवत आहेत. यामुळे सध्या राज्याचे राजकारण ऐन हिवाळ्यात तापले आहे.मुंबईत सुरू असलेल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत एकाही आमदाराने मुंबई सोडू नये, असे आदेश दिले आहेत.  मुंबई-पुणे दोन तासांच्या अंतरावर असूनदेखील पक्षाध्यक्षांमुळे पुण्यातील सहा आमदारांनादेखील मुंबईतच मुक्काम करावा लागत आहे.    .........पक्षाच्या वतीने सर्व आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत एकाही आमदाराने मुंबई सोडून जाऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. परंतु, गुरुवारी (दि. ३१) महापालिकेची स्थायी समितीची पूर्वनियोजिक बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणे आवश्यक असल्याने  मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची परवानगी घेऊन बैठकीसाठी उपस्थित राहिलो आहे.  - सुनील कांबळे, नवनिर्वाचित आमदार व स्थायी समितीचे अध्यक्ष

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाGovernmentसरकारMLAआमदारMumbaiमुंबई