शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

“आपल्याच मुख्यमंत्री, पक्षप्रमुखाला वेडं बनवायच, यालाच म्हणतात "येड्यांची जत्रा”; नितेश राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 20:14 IST

देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत(Shivsena) प्रवेश केला आहे.

ठळक मुद्देआपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर करायचीभाजपा आमदार नितेश राणेंचा शिवसेनेच्या नेत्यांना टोलानितेश राणेंच्या कार्यपद्धतीला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केल्याचा भाजपा नगरसेवकांचा दावा

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष कामी होण्याची चिन्ह नाहीत. नुकतीच नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सांगता झाली. सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी जनआशीर्वादच्या माध्यमातून चांगलंच वातावरण निर्माण केले होते. परंतु ही यात्रा संपून काही दिवस उलटले नाहीत तोवर जिल्ह्यातील राणे समर्थक २ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करुन नारायण राणेंना धक्का दिला आहे.

देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत(Shivsena) प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपा नगरसेवकांनी हातावर शिवबंधन बांधलं आहे. आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केल्याचं भाजपा नगरसेवकांनी सांगितले. भविष्यात कणकवली मतदारसंघातील अनेकजण शिवसेनेत येतील असा दावाही करण्यात आला आहे.

मात्र भाजपा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर आमदार नितेश राणे यांनी टोला लगावला आहे. नितेश राणे ट्विटमध्ये म्हणतात की, आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करून.. आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेड बनवायच. यालाच म्हणतात "येड्यांची जत्रा" अशा शब्दात नितेश राणेंनी उदय सामंत आणि वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

 ‘तो’ राणे कुटुंबासाठी भावनिक क्षण; आई-वडिलांबाबत बोलताना आमदार नितेश राणे भावूक

शिवसेना राणे कुटुंबाशी कसं वागली विसरणार नाही

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यावर केलेल्या विधानानंतर शिवसैनिकांनी राणेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. राणेंच्या जुहू बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करत आंदोलन केले होते. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणेंनी शिवसेनेला इशारा दिला. नितेश राणे म्हणाले होते की, आपल्या देशाचा अपमान होत असताना भारतीय नागरिक गप्प बसतील का? एका मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव की हिरक महोत्सव विचारावं याविरोधात तो संताप आहे. आमच्या घरावर जी मुलं पाठवली. आम्ही कुणीही नव्हतो तेव्हा ते सगळे घरावर आहे. पण आता ती वैयक्तिक लढाई त्यांनी केली. आमच्या घरात मुलं होतं. उद्या जर काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण असतं? आमच्या वडिलांना शिव्या घालताना आम्ही विरोध करायचा नाही का? मग तुम्ही जी भाषा वापरता ती आम्ही वापरली तर ते चालत नाही. सुरुवात त्यांनी केली पण आता व्याजासह प्रत्युत्तर आम्ही देऊ असा इशाराही नितेश राणेंनी दिला होता.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे Uday Samantउदय सामंतVaibhav Naikवैभव नाईक