शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 09:40 IST

गणेश मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीवरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा आक्रमकपणे भाषण करत सवाल उपस्थित केले. 

अमरावती - ही सभा होईपर्यंत फार मस्ती सुरू होती. नितेश राणेला अचलपूरला येऊ देणार नाही. परतवाडा इथं सभा घेऊ देणार नाही असं बोलत होते पण एक लक्षात ठेवा, हे आमचं हिंदू राष्ट्र आहे तुमच्या अब्बाचं पाकिस्तान नाही. हिंदू समाज फ्लॉवर नही, फायर है...सभा आयोजित केल्यानंतर फार हिरवे साप वळवळत होते. कुठे गेले ते १५ मिनिटवाले...अशा शब्दात भाजपा नेते नितेश राणे यांनी ओवैसींवर हल्लाबोल केला आहे.

अमरावतीत सकल हिंदू समाजाकडून रॅली आणि धर्मसभेचं आयोजन केले होते. या सभेत नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भाषण केले. नितेश राणे म्हणाले की, हैदराबादच्या त्या XXX बोलवा, आम्ही इथं परतवाड्यात आहोत सांगा. १५ मिनिटे खूप झाली, ५ मिनिटांत उरलेसुरले संपवू. तुम्ही कुणाला आव्हान देता, हिंदू समाज मोठ्या प्रमाणात एकवटला आहे. हिंदूकडे वाकड्या नजरेने कुणी बघू नये. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. आम्ही तुम्हाला छेडलं नाही. तुम्ही पाहिजे ते कराल मग आम्ही हिंदूंच्या बाजूने बोलायचं नाही का असा सवाल नितेश राणेंनी केला.

तसेच आम्हाला महाराष्ट्रात वातावरण खराब करायचं नाही. तुम्ही भाईचाराबाबत आम्हाला बोलता, सर्वधर्मसमभाव बोलतात मग तो नियम तुम्हाला नाही का? तुमच्यासाठी नियम वेगळे आहेत का? जो नियम इतर धर्मांना, सणांना लागतो तोच नियम गणेश मिरवणुकीला आणि नवरात्रीच्या सणांना लागला पाहिजे हे आमचे स्पष्ट म्हणणं आहे. तुम्ही पाहिजे तेवढ्या मिरवणुका काढाल, धिंगाणा घालाल. रात्री २ वाजेपर्यंत डिजे वाजवाल परंतु हिंदू समाज रस्त्यावर उतरून जल्लोष करतो तेव्हा तुम्हाला मिरच्या का झोंबतात अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.

दरम्यान, माझ्यावर दंगलीचे आरोप करता परंतु नुकतेच गणेश मिरवणुकीनंतर दुसऱ्या दिवशी ईदची रॅली निघाली. या देशात आणि महाराष्ट्रात ईदच्या रॅलीवर हिंदू समाजाने कुठेही दगडफेक केली नाही. कुठेही गोंधळ केल्याचं एकतरी उदाहरण द्या. मात्र आमच्या मिरवणुकीवेळी प्रत्येक वेळी दगडफेक झालीय मग आम्ही कुणीही बोलायचे नाही. आम्ही घरी गप्प बसायचे? आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा देशात सर्वधर्मसमभाव आहे, भाईचारा आहे असं सांगितले जाते. हा कुठला न्याय आहे असं नितेश राणेंनी विचारले. 

टॅग्स :BJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे Hinduहिंदू