शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी शरद पवारांमुळे हरवली; पडळकरांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 13:04 IST

शरद पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? जातीजातीत भांडणे महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती बिघडवायची आहे का, दलित-ओबीसी नव्याने वाद निर्माण करण्याचा अध्याय घालायचा आहे का असा सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे.

मुंबई - शरद पवारांच्या अर्ध्या विधानाशी मी सहमत आहे. महाराष्ट्राचा चेहरा सुधारण्याची आणि बदलण्याची आवश्यकता होती ती देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केली. शरद पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय. ५०-६० वर्ष महाराष्ट्राची सत्ता शरद पवारांच्या हाती होती तेव्हा त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्राला आणि हिंदुस्तानाला जी तेजाची झळाळी दिली होती ती शरद पवारांमुळे हरवली अशी बोचरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र जो अठरापगड जाती, १२ बलुतेदारांचा आहे तो शरद पवारांनी स्वत:ची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालवला. पवार अँन्ड पवार कंपनी आता पवार अँन्ड सुळे कंपनी झालीय. जातीजातीत वाद लावायचे, जातीजातीत झुंजवत ठेवून प्रस्थापितांची घरे भरायची त्यामुळे याला कंटाळून महाराष्ट्रातील लोकांनी २०१४ ला परिवर्तन केले असं त्यांनी म्हटलं. 

तसेच शरद पवारांचा महाराष्ट्रात जो शासनकाळ होता, तो महाराष्ट्राच्या इतिहासातील काळीकुट्ट पाने होती. पवारांनी फक्त भ्रष्टाचार केला, जातीयवाद केला आणि लोकांमध्ये भांडणे लावली. त्यामुळे आता शरद पवारांनी निश्चिंत राहावे, निवांत राहावे, हरिनामाचा जप करावा म्हणजे तुमच्या डोक्यात पुण्य काम करण्याची इच्छा जागृत होईल असा टोला गोपीचंद पडळकरांनी लगावला. 

दरम्यान, २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला देशात परकीय गुंतवणुकीत नंबर एकला आणलं आहे. आज महाराष्ट्रातील युवकांना काम मिळतंय. वेगवेगळे उद्योग महाराष्ट्रात येतायेत. महिला सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात होतंय त्यामुळे महाराष्ट्राची ही प्रगती शरद पवारांना कुठेतरी खुपतेय. आज इतका आश्वासक चेहरा महाराष्ट्राला मिळाल्यानंतर शरद पवारांना हा चेहरा बदलून महाराष्ट्रात जातीयवाद निर्माण करायचाय का? महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? जातीजातीत भांडणे महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती बिघडवायची आहे का, दलित-ओबीसी नव्याने वाद निर्माण करण्याचा अध्याय घालायचा आहे का असा सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे.

शरद पवार गटाचं पडळकरांना प्रत्युत्तर

काही लोक भाजपाचं बिस्किट खाऊन भुंकत असतात. त्यांना पुरोगामी काय आणि पुरोगामी विचार काय हे माहिती नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो बोलले होते मग अद्याप का दिलं नाही? आता तर तुम्ही आमदार झालात. भाजपाच्यावतीने किल्ला लढवतायेत. मग का तुम्ही फडणवीसांच्या बंगल्यावर मोर्चा काढत नाही, धनगर समाजाला आरक्षणाची मागणी करत नाही? शरद पवारांवर कॅन्सर झालाय, त्यावर इतक्या खालच्या पातळीवरील वक्तव्य फक्त पडळकर करू शकतात दुसरा कुठलाही नेता करू शकत नाही. धन्य ते भाजपा, ज्यांनी गोपीचंद पडळकरांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन उरावर घेतले आहे असा घणाघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गोपीचंद पडळकरांवर केला. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस