शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी शरद पवारांमुळे हरवली; पडळकरांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 13:04 IST

शरद पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? जातीजातीत भांडणे महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती बिघडवायची आहे का, दलित-ओबीसी नव्याने वाद निर्माण करण्याचा अध्याय घालायचा आहे का असा सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे.

मुंबई - शरद पवारांच्या अर्ध्या विधानाशी मी सहमत आहे. महाराष्ट्राचा चेहरा सुधारण्याची आणि बदलण्याची आवश्यकता होती ती देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केली. शरद पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय. ५०-६० वर्ष महाराष्ट्राची सत्ता शरद पवारांच्या हाती होती तेव्हा त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्राला आणि हिंदुस्तानाला जी तेजाची झळाळी दिली होती ती शरद पवारांमुळे हरवली अशी बोचरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र जो अठरापगड जाती, १२ बलुतेदारांचा आहे तो शरद पवारांनी स्वत:ची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालवला. पवार अँन्ड पवार कंपनी आता पवार अँन्ड सुळे कंपनी झालीय. जातीजातीत वाद लावायचे, जातीजातीत झुंजवत ठेवून प्रस्थापितांची घरे भरायची त्यामुळे याला कंटाळून महाराष्ट्रातील लोकांनी २०१४ ला परिवर्तन केले असं त्यांनी म्हटलं. 

तसेच शरद पवारांचा महाराष्ट्रात जो शासनकाळ होता, तो महाराष्ट्राच्या इतिहासातील काळीकुट्ट पाने होती. पवारांनी फक्त भ्रष्टाचार केला, जातीयवाद केला आणि लोकांमध्ये भांडणे लावली. त्यामुळे आता शरद पवारांनी निश्चिंत राहावे, निवांत राहावे, हरिनामाचा जप करावा म्हणजे तुमच्या डोक्यात पुण्य काम करण्याची इच्छा जागृत होईल असा टोला गोपीचंद पडळकरांनी लगावला. 

दरम्यान, २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला देशात परकीय गुंतवणुकीत नंबर एकला आणलं आहे. आज महाराष्ट्रातील युवकांना काम मिळतंय. वेगवेगळे उद्योग महाराष्ट्रात येतायेत. महिला सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात होतंय त्यामुळे महाराष्ट्राची ही प्रगती शरद पवारांना कुठेतरी खुपतेय. आज इतका आश्वासक चेहरा महाराष्ट्राला मिळाल्यानंतर शरद पवारांना हा चेहरा बदलून महाराष्ट्रात जातीयवाद निर्माण करायचाय का? महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? जातीजातीत भांडणे महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती बिघडवायची आहे का, दलित-ओबीसी नव्याने वाद निर्माण करण्याचा अध्याय घालायचा आहे का असा सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे.

शरद पवार गटाचं पडळकरांना प्रत्युत्तर

काही लोक भाजपाचं बिस्किट खाऊन भुंकत असतात. त्यांना पुरोगामी काय आणि पुरोगामी विचार काय हे माहिती नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो बोलले होते मग अद्याप का दिलं नाही? आता तर तुम्ही आमदार झालात. भाजपाच्यावतीने किल्ला लढवतायेत. मग का तुम्ही फडणवीसांच्या बंगल्यावर मोर्चा काढत नाही, धनगर समाजाला आरक्षणाची मागणी करत नाही? शरद पवारांवर कॅन्सर झालाय, त्यावर इतक्या खालच्या पातळीवरील वक्तव्य फक्त पडळकर करू शकतात दुसरा कुठलाही नेता करू शकत नाही. धन्य ते भाजपा, ज्यांनी गोपीचंद पडळकरांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन उरावर घेतले आहे असा घणाघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गोपीचंद पडळकरांवर केला. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस